Thursday 29 November 2018

"पिंक सिटी गजक जैसी मिठी"



"पिंक सिटी गजक जैसी मिठी" 

जयपूर हे राजस्थानची राजधानी आहे. जयपूरला 'गुलाबी शहर' म्हणुनही ओळखले जातेया शहराची स्थापना इ.स. १७२८ मध्ये महाराजा जयसिंग-दुसरा यांनी केली. महाराजा जयसिंगदुसरा यांच्या नावावरून या शहराला जयपूर हे नावपडले आहे. येथील लोकसंख्या इ.स२००३ मध्ये जवळजवळ २७ लाख होती.जयपूर शहरयेथील महाल आणि जुन्या घरांसाठी वापरलेल्या गुलाबी दगडांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच जयपूर हे शहर समृद्धी परंपरा,संस्कृती परंपरा, ऐतिहासिक परंपरा यासाठीदेखील प्रसिद्ध आहे. पूर्ण शहर सहा भागांत १११ फुटी रस्त्यांनी विभागले आहे.
जयपूर हे शहर उत्तम आधुनिक शहर तसेच सर्वात नियोजित आणि व्यवस्थित शहर म्हणून ओळखले जाते. एकोणविसाव्या शतकात जयपूर शहराचा विस्तार सुरू झाला. त्यावेळी त्याची लोकसंख्या सुमारे १,६०,००० होती. येथील मुख्य उद्योग धातुकाम, संगमरवर,वस्त्र-छपाई,हस्तकला रत्न व दागिन्यांची आयात निर्यात, आणि पर्यटन व्यवसाय इत्यादी आहेत. जयपूरमध्ये सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवामहल, अंबर महल, मुबारक महल, जलमहल, इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत. जयपूर हे भारतातील सर्व सुंदर शहरांतले एक आहे.भारताच्या पर्यटनातील सुवर्ण त्रिकोणात जयपूर शहर मोडते. या त्रिकोणात जयपूर-आग्रा-दिल्ली ही शहरे येतात. सवाई जयसिंग-दुसरा यांनी १६९९ ते १७४४ पर्यंत राज्य केले तेव्हा त्यांची राजधानी अंबर होती. अंबरहे शहरआजच्या जयपूरपासून ११ किलोमीटरवर आहे.इ. स. १८७६ मध्ये त्या काळातील महाराजा सवाई रामसिंग यांनी इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ प्रिन्स ऑफ वेल्स युवराज अल्बर्ट यांच्या स्वागतार्थ संपूर्ण शहराला गुलाबी रंग दिला होता तेव्हापासून या शहराला गुलाबी शहर असे नाव पडले आहे. खरंतर हा गेरू रंग आहे परंतु गेरू रंगाला इंग्रजीत असे काही खास नाव नाही.  हा रंग गुलाबी रंगाशी मिळताजुळता असल्याने या रंगाला पिंक रंग संबोधून जयपूर शहराला पिंकसिटी म्हणतात.


माऊंटन एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे या ग्रुपची जयपूर टूर दिनांक १८ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१८ या दरम्यान होती.आम्हा ट्रेकर्ससाठी वर्षातून एखादी छोटी टूर असली म्हणजे जरा थकलेल्या जीवाला बरं वाटतं. दिनांक १८ नोव्हेंबरला आम्ही सगळे टूरकर आपापल्या घरातून निघून कोणी कॅबने तर कोणी लोकल ट्रेननेयेऊन पुणेस्टेशनला पोहोचलो. रविवारी दुपारी ४च्या सुमारास आमची पुणे-जयपूर एक्सप्रेस जयपूर कडे निघाली. काही लोक वातानुकूलित बोगीमध्ये बसले आणि आम्ही काही लोक बिनवातानुकूलित बोगीमध्ये बसलो.प्रवासाची सुरुवात अर्थात सोबत असलेल्यांची ओळख परेड आणि अन्ताक्षरीने आणि फोटोग्राफीने झाली.
पुणे स्टेशनहून निघालेली ट्रेन लोणावळ्यातील आमचे काही प्रवासी घेऊन निघाली आणि खंडाळा घाटात पोहोचल्यावर ते संध्याकाळचे कोवळे ऊन, थंडगार वारा आणि सूर्य अस्ताला निघाल्यावरची निरामय शांतता त्या झुकझुक आवाज करणाऱ्या ट्रेनमध्येदेखील जाणवत होती. कारण सह्याद्रीची अनेक छटांची रांग समोर असली, सूर्य सोबत असला,खोल दर्यांचे अप्रतिम दृश्य समोर असले की मला आजूबाजूला काय आहे? कोण आहे याचा देखील विसर पडतो. डोंगरदर्यांच्या मधोमध एखादे कौलारू घरांचे गाव पाहायला मिळणे म्हणजे पंचामृत मिळाल्यासारखेच आहे. पळसदरीमधल्या सूर्यदेवाला टाटा करून आम्ही हिरव्या-हिरव्या रंगाची झाडी घनदाट अशी अनेक गाणी गात खंडाळा घाट उतरत होतो. आमची एक्सप्रेस पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-भिवंडी रोड-वसई रोड-आणि मग पुढे गुजरात सुरत असे करत जयपूरच्या वाटेला निघाली. आम्ही आपले आम्ही आणलेला दिवाळीचा फराळ आणि घरून आणलेला रात्रीचा जेवणाचा डबा संपवून गप्पा करीत झोपून गेलो. 

राजस्थानच्या हद्दीत सकाळ उजाडली. आपल्यासारखा तिकडे प्रत्येक स्टेशनवर चहा मिळत नाही. कोटा जंक्शनवर सकाळच्या चहाचा आस्वाद घेतला, पुढे मधुर पेरूचा आस्वाद घेतला, सवाईमाधोपूरवर थोडावेळ उतरून फोटोग्राफ़ी करून आम्ही १९ तारखेला दुपारी दोनच्या सुमारास जयपूर स्टेशनला उतरलो. माऊंटन एज ग्रुपचे नियोजनच भारी असते. आम्ही पोहोचण्याच्या आधीच एक भारी बस आम्हा पाहुण्यांना घ्यायला आली होती. आमच्या आगमनाने जयपूरचे गाल आनंदाने गुलाबी गुलाबी झाले असावेत असे भासत होते. आम्हाला  भूक लागल्याने आम्ही राजस्थानच्या प्रसिद्ध दाल-बाटीचा आस्वाद घेऊन मगच आम्ही ४दिवसाच्या पाहुण्या घरी गेलो.(हॉटेलवर). 


चोवीस तासाच्या प्रवासानंतर हॉटेल राजप्लाझामध्ये प्रवेश करून  खांद्यावरची वजन सॅक उतरवून फ्रेश होऊन वेळ वाया न घालवता ५च्या सुमारास संध्याकाळच्या शहर भेटीला निघालो. हॉटेलच्या बाहेर लगेचच विवेकविहार हे मेट्रो स्टेशन आहे तिथे आम्ही रोज फोटो काढू लागलो आणिमी मी एकदा तरी मेट्रोत बसेन असे वाटले परंतु यावेळी मेट्रोमध्ये बसण्याची संधी मिळाली नाही. 


संध्याकाळी सर्वात आधी जलमहलला भेट दिली पाण्यात खालून तीन मजली असे हे जलमहलआहे.  जयपूर शहराच्या मानसागरझिलच्या मधोमध हे ऐतिहासिक महल आहे. अरवली पर्वताच्या कुशीतआणि मधोमध असल्याने याला आयबॉल असेही म्हणतात. सवाई जयसिंग यांनी हे दोन मजली महल बांधले असून छत्रीच्या आकाराचे बुरुज आणि शिड्यांचेजिने अशी याची बांधणी आहे.हे जलमहल आता पक्षी अभयारण्य म्हणून सुद्धा विकसित होत आहे. इथल्या नर्सरीतएक लाखाहून अधिक झाडे लावली आहेत तसेच राजस्थानातील सर्वात उंच झाडे इथे पाहावयासमिळतात. राजे लोकांनी स्नानासाठी तसेच राण्यांसोबत खास वेळ घालवण्यासाठी हे महल बनवले गेले असे म्हणतात. आम्ही रात्रीच्या वेळी हे महल पाहिल्याने रात्रीच्या दिव्याच्या प्रकाशामुळे पाण्यात त्याचेप्रतिबिंबदिसत होते.


इथून लगेच आम्ही अमेर किल्याकडे रवाना झालो. जयपूरच्या हद्दीतच अमेर हे शहर आहे. राजा आलनसिंह यांनी आमेर शहराची स्थापना केली. येथील मंदिर आणि शहर,किल्ला राजपुती कलेचे उत्तम उदाहरण आहे. सुप्रसिद्ध निर्माता फिल्मच्या शूटिंगसाठी इथे येत असतात. चाळीसखांबवाला शीशमहल इथेच आहे, इथे माचीसची काडी किंवा मेणबत्ती  पेटवली असता पूर्ण शीशमहल दिपावलीसारखे उजळून निघते. स्थानिक पर्यटकांपेक्षा परदेशी पर्यटकांचे हे खास आकर्षण आहे. आंबेर देवीच्या मंदिरामुळे हे शहर देशभरात प्रसिद्ध आहे तसेच येथील  हत्तीची सवारी खास आकर्षण आहे. आम्ही अमेर किल्यावर एक तासाचा संगीतमय लाईट शो अनुभवलाआकाशात चांदणे, अचूक माहिती, अप्रतिम प्रकाशयोजना, मधुर संगीत आणि  सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा भारदस्त आवाज या सर्वामुळे आमेर किल्यावरील लाईट शो आम्हा सगळ्यांनाच आवडला.
अमेर किल्यावरून प्रसन्न मनाने निघालो आणि बाहेरच रात्रीचे जेवण आटोपून हॉटेलवर जाऊन ओळख परेड करून आपापल्या रूममध्येगप्पा मारीत गुडूप झालो. सकाळी पहाटे ६वाजता झालना लेपर्ड सफारी साठी तयार होऊन निघालो खरे.आम्ही २० लोक असल्याने ३जिप्सी केल्या होत्या, दोन जिप्सी पुढे गेल्या आणि आमच्या जिप्सीचा चालक हॉटेलजवळच चकरा मारत होता आणि असं दाखवत होता कीजणू याला सगळं माहिती आहे. नंतर आम्हीच म्हटलं," भैया यही पे चक्कर क्यू काट रहे हो?"तेव्हा लेकाचा सांगतो मै नया हूं रास्ता नहीं मिल रहा. त्यापुढे पुढेगेलेली एक जिप्सी पुन्हामागे बोलवून मग सोबत गेलो तेव्हा अचूक रस्त्यावरपोहोचलो. 


त्या गुलाबी शहरात गुलाबी थंडीमध्ये खुल्या जिप्सीमध्ये भन्नाट अनुभव घेता आला. अर्धा तेपाऊण तास अंतर आम्ही तेथील प्रसिद्ध पंडितजीची  गरम चहा आणि खुल्यारोड वर खुली जिप्सी सफारी खुल्या मनाने अनुभवली आणि जाल्हनाच्या जंगलात पोहोचलो. पोहोचताच मोर, निल गाय, हरीण, माकडे, ट्री-पाय पक्षी यांनी आमचे स्वागत केले. त्या नवीन चालकाला शहरातला रस्ता माहित नव्हता परंतु जंगलातील रस्ता चूक माहित होता आणि प्राणि पक्षांबद्दलची अचूक माहिती तो देत होता.शिवाय रिव्हर्स एक्स्पर्ट होता. इतका एक्स्पर्ट होता की आम्हाला जीव मुठीत धरून बसावा लागे. या जंगलात ३०ते ३५ बिबटे आहेत असे तेथील जंगल अधिकारी आणि गाईड चालक यांनी सांगितले परंतु सकाळच्या २ तास सफारीमध्ये  आम्हाला एकही बिबटे महाराज दिसले नाही. परंतु आम्ही जंगलातील खुली सफारी, शांतात, त्यात पक्षांचे मधुर आवाज ऐकले आणि फोटोग्राफ़ीचा आनंद घेतला आणि आमच्या ३ जीप्सचे समोरासमोर आल्या की आम्ही एकमेकाला विचारात असू, "तुम्हाला किती बिबटे दिसले रे ?"आम्हाला ३ बिबटे दिसले. नंतर समजले आम्ही एकमेकाला खोटे सांगत होतो. 
सफारीहून निघताना आता सपाटून भूक लागली होती हॉटेलवर परतत असताना बिकानेरवाला इथे आम्ही आपापल्या आवडीचा नास्ता केला. या ठिकाणी असंख्य प्रकारची मिठाई आम्हाला पहावयास मिळाली. 


पुन्हा हॉटेलवर जाऊन मस्त आवरून दुपारचे जेवण करून संध्याकाळच्या सफारीला निघालो यावेळी आमचा जिप्सी चालक बदलला होता. आम्ही सफारी साठी गेलो असता तिथे कडक नियम आहे की जिप्सीच्या खाली कोणीही उतरू नये परंतु तेथील जंगल खात्यातील जंगलात काम करणाऱ्या बायका जिगरीने बिबट्याचा वावर असेल तिथे काम करत होत्या चहा बनवत होत्या
त्यांना सलाम.
सकाळी बिबटे महाराज दिसले नाही आता तरी दर्शन देतील अशी आशा हॊती.जंगलातप्रवेश केल्यावर साडेतीनच्या सुमारास बिबट्याने दर्शन दिलेआणि आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. दुसऱ्या जिप्सीना बोलावण्यासाठी आमच्या चा लकाने काय जोरदार शिट्टी वाजवली. सगळ्या जिप्सी बिबट्या पाहावयास एका जागी जमा झाल्या. खचाखच-खचखच-खचाखच नुसता कॅमेऱ्यांचा आवाज येत होता. खरंतर ती ज्युलिएट नावाची बिबटिन होती. पाणी प्यायला आली होती ती. त्यानंतर तिला भूक लागली असावी ती एका मोराच्या मागे चालू लागली मोर झाडावर चढल्यावर ती त्याला खाली ये म्हणून अशा अर्थाने गुरुगुरु लागली.त्यानंतर तो मोर काही झाडावरून उतरला नाही त्यामुळे ती एक सशाच्या मागे लागली त्यानेही तिचा डोळा चुकवला आणि तो ससा बचावला.  आम्ही दुसऱ्या रस्त्याने गेल्यावर पुन्हा दुसऱ्या बाजूने आमच्या समोरून नीलगाईकडे चालत होती.  नीलगाय घाबरून जिवाच्या आकांताने पळत होती. इथे जंगलात बिबट्या दिसला तर सगळे प्राणी एकमेकांना विशिष्ट आवाज काढून सावध करत असतात हे विशेष आहे त्याला कॉल आला म्हंटले जाते. माकड, नीलगाय,खारुताई, मोर  यांचे घाबरत ओरडणे म्हणजे बिबट्या जवळपास कुठेतरी आहे असे अचूक ओळखणे म्हणजे चालकाचे कौशल्यच म्हणता येईल. बिबट्याचे आगमन झाल्यावर मात्र टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतात सगळेच बाळगतात त्यामुळे आपण बिबट्याचे नीट दर्शन घेऊन शकतो फोटोग्राफी करू शकतो. मनसोक्त फोटोग्राफी व्हिडीओ क्लिप्स केल्या गेल्या.एक वेळेला इतक्या जिप्सी आजूबाजूला असताना ती मात्र राणीसारखी रुबाबाबतच चालत होती. पुन्हा ती नीलगायीला शोधत जंगलात गायब झाली.

सफारीची वेळ अजून संपली नव्हती त्यामुळे चालक आम्हाला अचूक फिरवीत होता. संध्याकाळीनिघायच्या वेळी पुन्हा एकदा ज्युलिएटचे आम्हाला दर्शन झाले. ती एका झाडीत उलटी करत होती त्याचा आवाज आमच्या चालकाने ऐकला  होता. आमची जिप्सी उभी होती त्यामुळे ती बाहेर येत नव्हती. आम्ही थोडे बाजूला झाल्यावर मोठ्या भिंतीवरून उडी मारून आमच्या समोरून जाऊ लागली. त्यावेळी तिने आमच्याकडे अतिशय रुबाबी कटाक्ष टाकला. आम्ही पुन्हा दुसऱ्या बाजूने तिला पाहायला गेलो तेव्हा मात्र ती झाडीमध्ये अदृश्य झाली. एका दिवसात इतक्या वेळा मिसेस बिबटीण दिसल्यामुळे दिल खुश हो गया था पैसा वसूल सफारी झाली. सूर्याला टाटा करून येताना चहा घेऊन रोड सफारीचा आंनद घेत पुन्हा राहत्या हॉटेलवर आलो-जेवलो. त्यादिवशी माझी पुण्यातली मैत्रीण जोना आणि शैलेशभाई जयपूरची प्रसिद्ध मिठाई गजक आणि माझी आवडती सोनपापडी घेऊन मला भेटायला आले. २तास मस्त गप्पा मारल्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 


दिनांक २० नोव्हेंबर सकाळी पुन्हा एक सफारी होती. आम्ही काही लोकांनी रूमवर आराम केला २जण आमेर किल्ला पाहण्यास गेले आणि सफारीवाले आल्यावर आम्ही नास्ता करून जयपूरमधील प्रसिद्ध ठिकाणे पाहावयास गेलो. हवामहल,सिटी पॅलेस, अल्बर्ट मुझियम,जंतर-मंतर-वेधशाळा ह्या तिन्ही गोष्टींमध्ये भरपूर वेळ गेला परंतु आमचे गाईड संदीप जैन यांनी अचूकमाहिती देत आम्हाला महाराज सवाई मानसिंग-दुसरा मुझियम, सिटी पॅलेस फिरवले. युद्धात वापरले जाणारे अंगरखे, तलवारी-भाले, बंदुका, जे पाहावे ते अवर्णनीय असे होते.


जंतर-मंतर ही जगप्रसिद्ध वेधशाळा आहे असे म्हणतात. जंतर-मंतर किंवा यंत्र मंदिर ह्या खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी बांधल्या गेलेल्या वास्तू आहेतइ.स. १७२४ ते १७३५ ह्या दरम्यान जयपूरचे महाराजा जयसिंग ह्यांनी भारतातील दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी व मथुरा ह्या ५ शहरांमध्ये ह्या वेधशाळा बांधल्या. ह्यांचा प्रमुख उद्देश खगोलशास्त्रीय तक्ते तयार करून सूर्य, चंद्र व इतर ग्रहांच्या गतीचे निरीक्षण, गणित वभाकित करणे हा होता. सवाई जयसिंगने अतिशय सूक्ष्मपणे ज्योतिविषयक वेध घेण्यासाठी जयपूर मध्ये वेधशाळा निर्मिली आहे ती आम्हाला पाहावयास मिळाली.


त्यानंतर आम्ही दुपारचे जेवण करून जयपूरमधील प्रसिद्ध बापू बाजारला भेट देऊन थोडीशी खरेदी केली. साच्यांनी कापडयावर फळांचे नैसर्गिक रंगाचे ठसे उमटवून पेंटिंग कसे करतात याचेप्रात्यक्षिकदेखील आम्ही पहिले. बापू बाजारमध्ये असंख्य प्रकारचे रंगीबेरंगी  कपडे दागिने आम्ही पाहत होतो घेत होतो. परंतु घेण्यापेक्षा पाहण्यात जास्त मजा होती. परंतु इतक्या मोठ्याबाजारात फिरून आम्ही लेडीजने जर खरेदी नाही केली तर नवलच. जमेल तेवढी खरेदी करूनआम्ही रात्री आठच्या सुमारास तेथील गणेश मंदिर आणि बिर्ला मंदिरला भेट दिली आणि हॉटेलला जाऊन जेवण करून आमच्या दोन दिवसात विस्कटलेल्या बॅगा पुन्हा भरून घेतल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही राजप्लाझा हॉटेलला टाटा करून अजमेरकडे निघालो. 
जाताना बसमध्ये माफिया खेळाने रंगत आणली. मध्ये एका ठिकाणी नास्ता करून पुन्हा अजमेरकडे निघालो. अजमेरच्या दर्गाला भेट दिली तेथील कपड्याचा आणि दागिन्यांचा बाजार खूपछान होता. जमेल त्यांनी इथे पुन्हा खरेदी केली. या दर्ग्याला भेट देण्यासाठी देशभरातून भक्तजन येत असतात.मन्नतचा धागा बांधून जातात अल्लाच्या दुवा घेऊन जातात.  दर्ग्याच्या अफाट गर्दीतून कसेबसे निघालॊ. येताना आनासागर लेक चौपाटीवॉर थांबू वाटत होते परंतु आम्हाला अजमेरचा जगप्रसिद्ध पुष्कर मेळा पाहायचा होता.


अजमेरपासून सुमारे १४ कि.मी अंतरावर पुष्कर गाव आहे. इथे कार्तिक पौर्णिमाला हा मेळा सुरु होतो हा मेळा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात असतो. या ठिकाणी देशी आणि विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने हजरअसतात. इथे जगातील ब्रह्माचे एकमेव मंदिर आहे शिवाय हे तिर्थक्षेत्र असल्याने हजारो हिंदू भाविक इथे पवित्र स्नानासाठी येतात आणि पुष्कर झिलमध्ये स्नान करून पवित्र होतात. स्थानिक नगरपालिका या मेळ्याची व्यवस्था पहाते. सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करते.
यावेळी इथे म्हैस, घोडा, अशा प्राण्यांचे प्रदर्शनअसते.. यावेळी जवळजवळ १३००किलो वजनाची,१.३ करोड किमतीची रोज २५ लिटरहून अधिक दूध देणारी जोधपूरची म्हैस प्रदर्शनात असणे हेमेळ्याचे आकर्षण होते.  दोन उंटांना ट्रकमध्ये घालून नेत  होते  तर तो उंट जिवाच्या आकांताने हंबरत  होता. मुक्या प्राण्यांनासर्वात आधी कळते. त्यांना आता दुसऱ्या गावी नेत  आहेत  याची जाणीव होऊन तो रडत असावा. जातिवंत घोडे देखील प्रदर्शनात होते. उंटांना सजवून ज्याचा उंट देखणा दिसेल  त्यांना बक्षीस देखील दिले जाते.
आम्हाला जेवढे जमेल तेवढेच आम्ही फिरलो. कारण इतका प्रशस्त मेळा फिरायला वेळ आणि ताकद भरपूर हवी. टूरचाशेवटचा दिवस असल्याने आमच्याकडे जास्त वेळ नव्हता. या मेळ्याला इथे खास महत्व आहे. कपडे-दागिने-आपापले प्राणी घेऊन स्थानिक लोक इथे मेळ्यामधे येतात . प्राण्यांसाठी खेळ देखील आयोजित केलेले असतात. प्राण्यांना बक्षीस दिले जाते. अनेक प्रकारची खाण्याची दुकाने, सर्कस, उंच झुलणारे पाळणे, उंट सवारी अशी अनेक प्रकारची दुकाने इथे एका ठिकाणी पहावयास मिळतातपुष्कर मेळ्यामधे प्रवेश केल्यावर आधी कुठे जाऊ हा प्रश्न पडला होता मेळ्यामधे आमच्या ग्रुपचे लोक वेगवेगळी विखरली गेली होती. नम्रता, बुदगे सर कुटुंब, अंजली आणि मी असे ५ जण सोबत फिरत होतो.   राजस्थानी वेषभूषा करून फोटोग्राफी केली. वाळवंटामध्ये उंट सवारी केली. त्यावेळी करण-अर्जुन चित्रपटाचे शूटिंग झालेले मंदिर एका डोंगरावर पहिले आणि त्यात असलेली हवेली आम्हाला पहावयास मिळाली.
आवळ्याच्या झाडांची बाग पहिली. लोकगीते ऐकली. विकावयास आलेले सैंधव मिठाचे मोठमोठेखडकांसारखे खडे पहिले. पहावं ते आमच्यासाठी अद्भुत आणि नवल होते. आणि हेच वेगळेपण पाहण्यासाठी आपण दुसऱ्याराज्यात जातो. त्यादिवशी  दुपारचे जेवण म्हणजे फलाहारच केला. काहींनी दालबाटीचा आस्वाद घेतला.  त्यानंतर फिरफिरफिरलो  आणि तेथील  पवित्र समजला जाणाऱ्या ब्रह्मा घाटावर  जाऊन आलो व  ब्रह्ममंदिराला भेट दिली. त्यानंतर मात्र वेळ संपत आली आणि आम्ही तिथला रिक्षा पकडून आमच्या बसजवळआलो. आमची एक्सप्रेस  अजमेरहून असल्याने आम्हाला पुन्हा १४ कि.मी  आमच्या बसने अजमेरला यावे लागले. रात्री ८च्या सुमारास आम्ही अजमेर-बांद्रा एक्सप्रेसमध्ये बसून पुन्हा मुंबईमध्ये आलो आणि मुंबईतून पुण्यामध्ये आलो. अश्याप्रकारेगुलाबी शहराची (जयपूरटूर) करून सगळ्यांचे चेहरे आंनदाने गुलाबी होऊन आले. आमचे टूर लीडर श्री रोहित सर यांना टूर उत्तम रित्या आयोजित करून उत्तम रित्या पार पाडल्याने आणि उत्तम फोटोग्राफी केल्याने त्यांना मनाचा मुजरा.टूरसाठी न आलेले आमचे लीडर्स श्री मंदार सर आणि श्री  राणे सर पुढच्यावेळी संपूर्ण राजस्थान ट्रिप आयोजित करावी ही विनंती आहे.  सागर धुमाळ कुटुंब. बांदल कुटुंब,सविता कुटुंब, रोहितसर-वैशाली आणि त्यांचे आईवडील, नम्रता, बुदगे सर, अंजली या  सर्व टूरकरांचे  उत्तम सहकार्याबद्दल विशेष कौतुक.




Wednesday 24 October 2018

हटके ट्रेक ग्रुप,हटके ट्रेक...


हटकेश्वर ट्रेक
ठिकाण - पुणे जिल्हा
चढाई श्रेणी मध्यम-कठीण
उंची४२०० फूट
दिनांक २१ ऑक्टोबर २०१८
माऊंटन एज एडवेंचर अँड वाईल्ड ट्रेल्सचे संस्थापक श्री. मंदार थरवळश्री. मनोज राणे, श्री. रोहित नागलगाव, अनिल जाधव,  सर्पमित्र श्री. निकाळजे हे ट्रेकच्या माध्यमातून लोकांमध्ये निसर्गाची आवड निर्माण करून आरोग्यसंपन्न जीवन जगण्याचे तसेच निसर्गसंवर्धनाचे धडे अनेक वर्षे ह्या संस्थेतून तरुण तरुणींना देत आहेत..माऊंटन एज एडवेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स हा आमचा ट्रेक ग्रुप सध्या अनेक वेगवेगळ्या ठिकाणच्या उत्तमोत्तम सहली करण्यात खूप मग्न आहे तरीही आमच्यासाठी महिन्याचा एक ट्रेक हा फार महत्वाचा आहे असे समजून किमान एक ट्रेक तरी आयोजित करीत असतो आणि त्यालाट्रेकर्सचा प्रतिसाद देखील उत्तम असतो आणि आहे. 
सप्टेंबर महिन्यातील ताम्हिणी घाटामधील देवकुंडट्रेकनंतर ऑक्टोबरचा हटकेश्वरट्रेकचा दिवस उजाडलादिनांक २१ ऑक्टोबर २०१८ या दिवशी माऊंटन एज एडवेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स या  ग्रुपचा ९०वा ट्रेक हटकेश्वर हा आयोजित केला गेला असून तो पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात गोद्रे गावाच्या हद्दीतआहे.हटकेश्वर हे  शिखर समुद्रसपाटीपासून सुमारे ४२०० फूट उंचीवर आहे. हटकेश्वर निगडीपासून साधारण १०८ कि.मी. असून इथे पोहोचावयास अडीच ते तीन  तास लागतात. .आमच्या १५ ते ५५ वयोगटातील ६४ ट्रेकर्सच्या दोन बस आयोजित केल्या असून सकाळी  वाजता एक बस निगडीहूनव तळेगाव चाकण मार्गे निघून राजगुरूनगरला पोहोचली आणि एक बस सकाळी साडेसहाच्या सुमारास निगडी-चिंचवड-नाशिकफाटा-चाकण-राजगुरूनगरला पोहोचल्यावर एकत्र नास्ता चहा करून नवीन ट्रेकर मीनल रानडे यांच्या हस्ते नारळ फोडून,  शाहिरी करणारे प्रदीप अडागळे याने शिवगर्जना करून आमच्या बस पुन्हा पुढे नारायणगांव -अळेफाटाओतूर-डिंगोरे-बनकर फाटा-कोळेवाडीगणेश खिंड गोद्रे गाव येथे  ११च्या सुमारास पोहोचल्या.  नव्या-जुन्या ट्रेकर्सच्या धमाल अन्ताक्षरीच्या तालावर  तासाचा प्रवास केव्हा संपला ते कोणालाही समजले नाही. 
हटकेश्वर हे ठिकाण अजून फारसे प्रचलित नाहीइथे ट्रेकर्सचा अजून तरी फारसा वावर नाहीये.इथे फक्त २०० ट्रेकर्सने भेट दिली आहे त्या दोनशे ट्रेकर्समध्ये आम्ही ६० ट्रेकर्स असल्याने आम्हाला 
त्याचा खूप अभिमान आहे. आपण मराठी मातीत आणि सह्याद्रीच्या कुशीत राहतो हे आपले अहोभाग्य आहे. त्यात जुन्नर तालुका निसर्गसौंदर्याने सजलेलानटलेला आहे. .
हटकेश्वर या ४२०० फूट उंच शिखरावर स्वयंभूदुर्मिळ आणि थोडेसे दुर्लक्षित महादेवाचे मंदिर आहे यावरूनच या शिखराला हटकेश्वर हे नाव पडले आहे. लेण्याद्रीजवळ सह्याद्रीच्या पश्चिमघाट डोंगररांगेतूननिघून पूर्वेकडे प्रशस्त पसरलेल्या  वऱ्हाडया  डोंगररांगेत ४२०० फुटावर निसर्गाचा अद्भुत नैसर्गिक चमत्कार म्हणजे येथील हटकेश्वर नैसर्गिक पूल एक भौगोलिक आश्चर्य आहे. हजारो वर्षांपूर्वी वाऱ्यापावसामुळे निसर्गतः दगड मातीची झीज होऊन तयार झालेला हा पिन होल गॅप म्हणजे सह्याद्रीचे माणिकरत्नच जणू. आपण त्याला साध्या भाषेत नैसर्गिक पूल म्हणू. निलेशकुमकर वगळता आम्हीसगळे आणि लीडर्स हटकेश्वरच्या भेटीस पहिल्यांदाच जाणार असल्याने उत्सुकतेपोटी त्या नैसर्गिकपुलाचे सौंदर्य पाहण्यासाठी आमचे हुशार ट्रेक लीडर्स राणे सरमंदार सररोहित सरनिकाळजे यांनी खासदूरचा बस मार्ग अवलंबला त्यामुळे आम्हाला या अद्भुत पुलाचे सौंदर्य प्रत्यक्ष पाहता आले. .
आमचे आजचे तेथील स्थानिक मार्गदर्शक  निलेशकुमकर या अगोदर जेव्हा काही सहकारी घेऊन हटकेश्वरट्रेकला गेले तेव्हा त्यांनी ड्रोन कॅमेऱ्याने काढलेला या पुलावरील अप्रतिम फोटो इथे आपण पाहू शकतो. 
केव्हा केव्हा या अंताक्षरी आणि दमशेराजखेळासाठी सगळ्यांनाच दूरचा प्रवास हवाहवासा वाटतो परंतु एकदिवसीय ट्रेकमध्ये उन्हामुळे मात्र सकाळी जितक्या लवकर पोहोचू तितके सर्वांच्या हिताचे ठरते.कोळेवाडी सोडल्यानंतर जाताना उजवीकडे पिंपळगावजोगा धरणाचा प्रशस्त जलाशय तिरक्या नजरेने खुणावत होताजणू,"पाहुण्यांनो दुरूनच चाललात का?जावा जावा कुठेही जावा इथून तिथून मीच विस्तारलॊ आहे,माझ्याकडे पहात पाहातच जावे लागणार आहे तुम्हाला.आणि माझ्याच गारव्याने सुखावणार आहात"
गोद्रे गावात पोहोचल्यावर लीडर्सने ट्रेकविषयी सूचना दिल्या आणि  निलेशकुमकर याने हटकेश्वरविषयी थोडक्यात माहिती दिली आणि ट्रेकला सुरुवात झाली. ऑक्टोबर महिना म्हणजे उन्हाचा तडाखा किती वाढतो हे ट्रेकर्सना सांगायला नकोप्रत्येकजण हातपाय झाकलेला फुल ड्रेस,टोपीसफेद रुमालतोंडाला गुंडाळून,गरजेपुरते पाणीसरबतइलेक्ट्रॉल पावडरफळेथोडाफार सुकामेवा ट्रेक सॅक मध्ये टाकून ट्रेकच्या पूर्ण तयारीत निघाला तरीदेखील  वरची वर्हाड्या डोंगररांग पाहून हबकलाच.कारणइथे झाडे फार क्वचित दिसत होतीत्यामुळे इतक्या उन्हात झाड नसेल काय काय हाल होऊ शकतात याचा अंदाज येऊ लागला होता. एक कि. मी.चा सरळ मातीच्या रस्त्यावर चालून वॉर्म अप झाला आणि आमची खरी कसोटी दिसून तिथेच आमचा धूर निघायला सुरुवात झाली. १०ते१२ घरांचे छोटे कुडाच्या, मातीच्या  भिंती असलेले गोद्रे गाव क्षणात पार केले.
१२ते १५ बकऱ्या घेऊन जाणाऱ्या  लहान मुली आमच्यासोबत चालत होत्या पायात साधी चप्पल आणिडोक्यावर काहीही नाही. त्या मुलीचे मला फार कौतुक वाटले.  . खरंतर आपण आपल्या शरीरालाफारच लाडावून ठेवतोआपले शरीर  ऊन वारा पाऊस यापासून लपवून ठेवतो आणि डी जीवनसत्वमिळत नसल्याने माझ्यासारख्याला हाडांचे आजार जडतात.   त्यासाठी ट्रेक हा उत्तम उपाय आहे. आपण स्वतःला कितीही झाकले तरी ऊन लागतेच लागते. 
(वरील सुंदर फुलांचे फोटो रोहित याने काढले आहेत)  
उन्हाने सगळेच जण झाड शोधत होते. एखादे झाड सापडले की सगळेजण पटपट सावलीतजागापकडून उभे राहू लागलेपण हे झाड वैगेरे फक्त पायथ्याशीच आढळले. वरती शिखरचढताना"झाड वाड कुछ नहीं था". अश्यावेळी निवडुंग दिसले तरी त्याच्या कणभर सावलीत ट्रेकर्स विसावाघेत होते. कोणत्याही गोष्टीची किंमत ती नसताना कळते तसेच अश्या कडक उन्हात मात्रएक झाड की किमत भी बहोत बडी चीज होती है बाबूतुला पहाते रे ) पाणी पिऊन आणि  जवळ असलेले घरचे लिंबू सरबत पिऊन माझे पोट टम्म झाले होते परंतु तहान काय भागत नव्हती. मी ट्रेक दरम्यान कधीहीइतके पाणी पित नाहीट्रेक नियमानुसार घोटघोट पाणी पिऊन ट्रेकमध्ये पाणी पुरवून ऊर्जा वाचवूनजात असतेपरंतु या ट्रेक दरम्यान मला आत्मविश्वासच कमी होऊ लागला होता. एक ट्रेक चुकला की असे होते कधी कधी. खूप पाणी पिऊ लागल्याने पोटामधे ढवळू लागले.होतेप्रत्येक मिनिटाला फोटो काढणारी मी माझे टप्प्याटप्प्यावर फोटो काढण्याकडे बिलकुल लक्ष नव्हते. जबरदस्त डिहायड्रेशन का कायते झाले होते मला. ही  गोष्ट माझ्यासोबत असलेल्या मयुरी थरवळ आणि गीता,राहुल शिंदे यांनाच माहित होती.  नेहमी येणारा ट्रेकर बलवानच असतो असा शिक्का त्या ट्रेकरवर असतो.त्यामुळे इतर लहानमोठ्या आणिनवीन ट्रेकर्सना असा झालेला त्रास सांगितला तर त्यांचेदेखील मन खच्चीकरण होते.त्यासाठी होता होईल तेवढे मी सहन करीत गेलेत्यावेळी मयुरी,गीता,आणि राहुल शिंदे यांची मला खूप मदत झाली.छोटे झुडूप आले तरी मी बसत होते आणि डोके फक्त झुडुपात घुसवित होते. हळूहळू एक तासात एकटप्पा पार केला आणि हायसे वाटले. त्या बकऱ्या घेऊन जाणाऱ्या मुली आणि बकऱ्या एकदम शांतपणेरांगेत चालल्या होत्या. त्या बकऱ्यांच्या राज्यात आम्ही आल्याने आमच्यातील मयुरीआणि आकाशयांना बकर्यांनी वळून चांगलीच ढुमळी दिली त्यानंतर त्या बकऱ्यांच्या नादाला कोणीही गेले नाही. "आधीच उन्हाचा तडाखा त्यात ही बकरीची ढुमळी खा" इतके कोणी सांगितलेय??राणे सर आणि  निलेशकुमकरच्या म्हणण्यानुसार अजून एक ते दिडच तास ट्रेक बाकी राहिला होता. दुपारचे बारा वाजले आणि माझी गाडी आज एक तासातच पंक्चर झाली.या शिखरावर अधेमध्ये कुठेही पाण्याची सोय नाही फक्त हटकेश्वर मंदिराजवळच पाणी मिळते त्यामुळे ऊन्हाच्या ट्रेकलाजायचेअसल्यास किमान ३ लिटर पाणी घेऊन जावे. .
नवीन जुने सगळे ट्रेकर्स उन्हामुळे दमले होते. निलेशकुमकरला आणि राणे सरांना प्रत्येकाचा एकच  प्रश्न असे निलेश सर, "ट्रेक अजून किती बाकी आहे?"आणि त्यांचे दोघांचे  एकच उत्तर असे "आताफक्त २० मिनिटे बाकी आहेत".माझे पोट बिघडले आणि बीपी  झिरो होत होता त्यामुळे मला काहीही सहन होत नव्हते. सगळ्यांच्याच जवळचे पाणी संपत आले होते. २ ते सव्वादोन तासाचा ट्रेक असल्याने आणि जेवणाची सोय खाली पायथ्याच्या गावात निलेशकुमकरच्यामामाच्या आमराईमध्ये असल्याने आणि उन्हाचा अंदाज  आल्याने सगळ्यांचाच अंदाज चुकला होता.मीमयुरी अक्षरशः वरच्या टप्प्यावर आता बसणारच आणि ट्रेक पूर्ण करणार नाही या विचाराने कशीबशी चढण चढत होतो. थांबायला तर एखादे छोटेसे झुडूप सापडे त्यात आम्ही १०-ते १२ डोकी खुपसत असू इतका उन्हाचा त्रास झाला. .त्यासाठी आमच्या वर्गमित्र तुषार ट्रेकरने एकटीप दिली आहे,उन्हाळ्यात ट्रेकच्या आद्ल्यादिवसापासून भरपूर पाणी प्यावेगरज वाटली तर एक ओआरएस  लिटर बाटलीबरोबर प्यायचेआणि ट्रेकसाठी खजूर मीठ लावून न्यायचा ( मॅरेथॉन पाळणाऱ्यांची टीप आहे म्हणे ही ) या टीपचा मी नक्कीच अवलंब करणार आहे. सोबत खजूर,शक्यअसली तर ताजी फळे नाहीतर सुकलेली फळे पिंपरीत साई ड्रायफ्रूट्स वाल्याकडे मिळतात ती आणणे फारच फायद्याचे ठरते. .. ट्रेकला जाताना सोबत घरचे लिंबू सरबत बनवून ते रात्री फ्रिजमधे ठेवणे आणि सकाळी बॅगमध्ये भरणे म्हणजे उन्हाच्या वेळेला ते आपली तहान शमवतेआणि भरपूर पाणी जवळठेवावे.  तेलकट पदार्थ मी ट्रेकसाठी नेत नाही ते ट्रेकर्सने नेले तरी ते ट्रेक संपल्यावर बसमध्ये खावेतअश्या बऱ्याच गोष्टींचे पालन केले की ट्रेक त्रासदायक होत नाही आणि ऊर्जा टिकूनरहातेआणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावरच मी माझा ट्रेक पूर्ण करते तशी इच्छाशक्ती प्रत्येकाजवळ असली की ट्रेक सुफळ संपूर्ण झाला म्हणून समजा. .
मागे वळून पाहिल्यावर समजले आम्ही दोन मोठाल्या स्टिफ डोंगरांना वळसा घालून आणि चढून आलो होतो. ट्रेकची एक धुंदी असते त्या धुंदीत आम्ही चालत असतो परंतु ह्या धुंदीत कधी कधी गुंडी वळते हे विसरता काम नयेदुपारच्या एक वाजता दुसरे एक मोट्ठे पठार आले तिथे गार वाऱ्याची झुळूक येत असल्याने जरा बरे वाटले. .आम्हाला वाटले  निलेश कुमकरची एक तासापासून चाललेली २० मिनिटे संपली वाटतेपरंतु तसे काही नव्हते. तिथे थोडावेळ थांबून  निलेश कुमकर याने आजूबाजूला दिसणाऱ्या गडकिल्ल्याविषयी माहिती दिली. .जुन्नरमध्ये या परिसरात हटकेश्वर हे ठिकाण मध्यवर्ती ठिकाणी असून इथून चहूबाजूला चावंड,शिवनेरी,हडसर,निमगिरी,सिंदोळा कुंजरगडहरीशचंद्रगडलेण्याद्री गणपती हे सगळे गडकिल्ले दिसतातयेडगाव धरण येथून दिसते. एकीकडे पिंपळगावजोगा  धरणाचा अथांग जलाशय अप्रतिम भासत होता. 
पावसाळ्यात इथे खूप पाऊस पडतोसप्टेंबर,ऑक्टोबर मध्ये इथे अनेक रंगीबेरंगी फुलांची बाग फुलते. .वर्षातून एकदाच येणाऱ्यारानफुलांची मखमली चादर पसरावी तसे रंगीत वातावरण इथे असते.
आम्ही  ते  ट्रेकर्सने या पठारावर थांबायचे ठरवले खरे परंतु आमच्याकडचे पाणी संपले होते आणि निलेशच्याआणि राणे सरांच्या मते हटकेश्वर मंदिर आता २० मिनिटांच्या अंतरावर असल्याने पाण्याची२तास वाट पहात तडफडण्यापेक्षा मी असेल ती ताकद लावून पाण्याजवळ जाण्याचा निर्णय घेतला. 
निलेश ते आताफक्त २० मिनिटे राहिली हे वाक्य इतका प्रेमाने सांगत होता  की ते आम्हाला खरंच वाटे.  आता जर मंदिर आले नाही तर  निलेशकुमकरला मी ढकलून देईन असे माझे गंमतीने कितीदा म्हणून झाले. सॉरी  निलेश कुमकर. 
आता पुन्हा  टप्पे चढण आलीमग मात्र मी बसून जवळ असलेला सुकामेवा,फळे काढली आणि सोबत असलेले कवी किरण टेकवडे आणि शाहिरी करणारे प्रदीप अडागळे यांना एक गाणे किव्वा पोवाडा ऐकवावयास भाग पाडले आणि खूप एनर्जी मिळाली त्या एनर्जीच्या बळावर पुढचे  टप्पे पार केलेकारण ट्रेक पूर्ण  करणे हे माझ्या नियमात नाहीजीव गेला तरी बेहत्तर पण ट्रेक पूर्ण करणार म्हणजे करणारचशेवटी आमचे ट्रेकगुरु आहेत मंदारसरराणे सररोहित सरनिकाळजे सर. .दुपारी २च्या सुमारास २टप्पे पार केल्यावर हटकेश्वर मंदिराची पत्र्याची शेड दिसली आणि हायसे वाटून बिघडलेले पोट हळूहळू जागेवर आले. .  दुपारी अडीच वाजता हटकेश्वर मंदिरात आम्ही पोहोचलो निलेशकुमकरसहित राहुल आणि इतर तिघे आम्हा दमलेल्यांच्या पाण्याच्या बाटल्या भरून देऊ लागलेआम्ही पाणी पूण तृप्त झालो आणि मगच खाली बसलो. त्या पाण्याची चव अप्रतिम होती. आणि त्या तहानलेल्या जीवाची तहान भागविणाऱ्या पाण्याची तुलना कशासोबतही  होऊ शकत नाही. 
.
निलेशकुमारने पुन्हा मंदिराविषयी माहिती दिलीआणि वऱ्हाडया डोंगररांगेची आख्यायिका सांगितलीपुराणकाळात एक वऱ्हाड या मंदिरात दर्शनासाठी आले आणि पुढे एका डोंगररांगेत हे वऱ्हाड गायब झाले म्हणून या पुढील डोंगराला वऱ्हाडडोंगररांग असे नाव पडले असावे. सर्वात पुढचा टोकदार डोंगर म्हणजे नवरदेवाचा टोपतो अद्भुत पूल म्हणजे नवरानवरीची गाठ आणि मागचीडोंगररांग म्हणजे त्यांचे वऱ्हाड आहे अशी आख्यायिका आहे.  त्यामुळे जुन्नर भागातील लोक या डोंगराला वऱ्हाडयाडोंगर असे म्हणतात. येथील हे हटकेश्वर मंदिर स्वयंभू आहे. दगडात कोरलेले  शिवलिंग आणि शिवलिंगाच्या बाजूला एका कोपऱ्यात वर्षभर वाहणारे पाण्याचे छोटेसे कुंड आहेमंदिराच्या गाभाऱ्यात नवस म्हणून वाहिलेले दगडाचे जीर्ण असे दोनशेएक नंदी आढळले. मंदिरालगत पौराणिक महत्व लाभलेल्या गणेश आणि हटकेश्वर गुंफा ह्या पूर्वीपासून भाविकांचे श्रद्धास्थान आणि ऋषीमुनींची तपोभूमीच आहे . नवनाथ ग्रंथात या डोंगराचा सोन्याचा डोंगर असा उल्लेख आहे. हट्केहश्वराच्या दर्शनासाठी तीन वेळा गेल्याने काशी क्षेत्राला गेल्याचे पुण्य लाभते असा उल्लेख काशीखंड या ग्रंथात आहे. हटकेश्वरमंदिराजवळ अर्ध्या तासावर आम्ही कोळेवाडी गावाजवळून पाहिलेलापूल होता. 
आमच्याकडे वेळ कमी असल्याने लीडर्सने गुंफा आणि नैसर्गिक पूल यांच्यातील एकच पर्याय निवडलाआणि तो म्हणजे तोच अद्भुत पूल. आम्ही तिनच्या सुमारास पुलाजवळ पोहोचलोकाही ट्रेकर्स अजून येतच होते. हजर असलेल्या  थोड्या ट्रेकर्स मधले काही ट्रेकर्स लीडर्सच्या सूचनेनुसार सहा-सहाच्या ग्रुपने एका झुडुपाला एक रोप लावून त्या अदभूत पुलावर जाऊन पोहोचले. त्यांना पाहून आम्हालाच जास्त आनंद झाला होता. उतरताना गवतामुळे अतिशय घसरडे होते.परंतु इच्छुक स्थळी पोहोचलॊ की मग थकवा कुठे जातो आणि ऊर्जा उत्साह कुठून येतो हे कोडे मला आजतागायत उमजले नाही.  हा अद्भुत पूल साधारण ५ते  फूट रुंद आहे आणि १२ते१५ फूट लांब आहे. आपण या पुलावर उभे राहिलो की समजते आपण या अवाढव्य निसर्गापुढे किती क्षुद्र प्राणी आहोत ते. आम्ही इथे थोडीशी फोटोग्राफी केली आणि मंदार सर आल्यावर बॅनर फोटो घेऊन शिल्लक असलेला आपापल्या जवळचा थोडाखाऊ संपवून साधारण पावणेचारच्या सुमारास लगेच परतीचा मार्ग धरला. येताना हटकेश्वर मंदिरात पुन्हा पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि मग मात्र सपासप पावले टाकीत निघालो. पोटात भुकेने कावळे नाही तर डोमकावळे ओरडत होते."पर ट्रेक पुरा करणे का आनंद बहोत बडी चीज होती है बाबू"
उतरताना आता उन्हाचा तडाखा संपला होता आम्ही गार वाऱ्याच्या तरंगावर उडत होतो जणू. आता प्रत्येक टप्प्यावर फोटोग्राफी सुरु होती. सूर्य हळूहळूअस्ताला निघाला होता त्यामुळे तो रंगछटांचे दर्शन लपवू शकत नव्हता. अप्रतिम रंगांची उधळण आम्ही कॅमेऱ्यात कैद करीत होतो. निवांत बसून घराकडे  जाणाऱ्या त्या वरून राजाकडे निवांत बसून बघत बसावे वाटत होते परंतु आम्हाला घराकडे जायचे होते. त्यामुळे सूर्य आणि कॅमेरा याची जुगलबंदी सुरु झाली होती. गवतफुले त्यांच्या लाटा,छटा,निसर्गाच्या हिरव्यासफेदकेशरीनिळ्यासुंदर रंगांची उधळणयेताना अनेक टप्पे पार केलेल्या डोंगमाथ्यांची वलयांच्या निळ्याधूसर छटा अप्रतिम भासत होत्या. पाहता पोटातील कावळ्यांना तसेच ओरडवत ओरडवतच संध्याकाळी साडेसहा-सातच्या सुमारास आम्ही आमच्या बसजवळ आलो. काही ट्रेकर्स पुढे येऊन आमराईत जेवण करून मस्त आराम करीत होते. आमच्यातील ४ते  ट्रेकर्सला त्रास होऊ लागल्याने लीडर रोहित सर त्यांच्यासोबत थांबले होते त्यांनी वाखाणण्याजोगी फोटोग्राफी केली. नुसता शांत बसेल तो ट्रेकर कसला??मयुरी थरवळमिपाटणकरमि.  सतीश बाबरमि. निलेश लोंढे यांच्यासोबत रोहित हे एकत्र थांबले होते. .  दुपारी जेवणाचा केलेला बेत वेळेअभावी फसला खरा परंतु निलेशकुमारच्या ओळखीच्या कुटुंबाने त्याच आमराईत संध्याकाळी -ते ८च्या दरम्यान गरम गरम बाजरीची भाकरीमासवडी,आमटी भातपापड लोणचे गुलाबजामूनच्या चविष्ट जेवणाने दुपारची जेवणाची कसर भरून काढली. खडप सरांच्या नवीन गाडीच्या पेढ्यांनी अजूनच लज्जत वाढवली.  त्यात सकाळी मयुरी थरवळ यांनी स्वतः बनवून आणलेले डिंकाचे लाडू आम्हाला सगळ्यांना खूप आवडले होते. दाणे दाणे पे लिखा है खानेवाले का नाम. अन्नदाता सुखींभव. ट्रेकर्सहो,मयुरीचा आवाजदेखील खूप गोड आहे बरं का.  
.
अश्याप्रकारे हटकेश्वरचा ट्रेक जरा हटकेच झाला उन्हामुळे सगळ्यांसाठीच हा धुरकाढू ट्रेक ठरला परंतु असा ट्रेक आपल्या शारीरिक क्षमता तपासण्यासाठी ट्रेकहवाच हवा असतो. रात्री ८च्या सुमारास आम्ही गोद्रेगावातून निघून-जुन्नर-नारायणगांव-चाकणनासिक फाटा -निगडी या रस्त्याने घर गाठलेयेताना प्रदीप अडागळे यांनी शाहीर राजू राऊत यांचा "अंधार फार झाला एक दिवा पाहिजे या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे" हा पोवाडा खणखणीत आवाजात सादर केला. तसेच शुभांगी कुलकर्णी यांनी गॊड आणि कडक आवाजात सादर केलेले शिवबांचे दोन्ही पोवाडे ट्रेक समारोपाला चार चाँद लावून गेले. राणे सरांनी सादर केलेली "तरीही आम्ही नाराज नाही व्हायचंहे असंच चालायचं,हे असंच चालायचं ही कविता अप्रतिम आणि मजेशीर होती. .
ट्रेकच्या आघाडीच्या  जबाबदारीचा  भार राणे सर सांभाळीत होते मधला भार मंदार सर सांभाळीत होते आणि शेवटचा भाररोहित सर आणि निकाळजे सांभाळीत होतेआमचे लीडर्स एखाद्या पालकाप्रमाणे पाल्याची काळजीघेतात,होता होईल तेवढा सगळ्यांना ट्रेक कसा पूर्ण करवता येईल याकडे त्यांचा कल असतो. अगदीच कोणाला ट्रेक पूर्ण करता आला नाही तर त्यांना कोणालाही एकटे  सोडता स्वतः एक लीडरत्या शेवटच्या ट्रेकर्ससोबत थांबतात. तुमच्या कार्याला आणि संयमाला आम्हा ट्रेकर्सचा सलाम. एखाद्याने ट्रेकच्या अवघड ठिकाणी जास्तीची मस्ती केली तर वेळप्रसंगी आम्हाला ओरडा खावा लागतो परंतु त्यामागे काळजी दडलेली असते. .
९० व्या ट्रेक दरम्यान लाभलेले असंख्य उत्तम फोटोग्राफर रोहित सर,जय-मंदार थरवळ निलेशकुमकर,यश थरवळ ,राणे सरमंदार सर,राहुल शिंदेहर्षद,सलोनीभावनाऋतुजा आणि ग्रुप,आकाश,पवनकरिष्मा आणि ग्रुपप्रशांत गुंड,खडप सरप्रशांत भावसार,रेखा सुमित,शेवाळकर सर,अंबादास कदम,गीता-ख़ुशी-इर,शमा-शुभांगी आणि गृपभूषण चौधरी,किरण-प्रदीपअमृत,अतुल बांगल,अनिकेत,आदी,कौस्तुभ,आकाश चौधरी,भावना आणि इतर सर्वांचे खूप कौतुककरावेसे वाटते. भूषण चौधरी याने कि.मी. चे अचूक मोजमाप केले त्याचे विशेष कौतुक. आजच्या ट्रेकचे मार्गदर्शक  निलेशकुमकर यांनी अतिशय उपयुक्त माहिती देऊन उत्तम मार्गदर्शन केले.राणे सरांची २०च मिनिटे राहिली आहेत ही क्लुप्ती फार कामी आली. ट्रेक लीडर्स आणि  निलेशकुमकर यांना शतशः धन्यवाद. .
वेळेअभावी ओळख परेड राहून गेली आणि कवी किरण याच्या कविता ऐकता आल्या नाहीतत्यासाठी किरणने आणि सर्व ट्रेकर्सने आपली प्रत्येकाची कला सादर करण्यासाठी पुन्हा पुन्हा माऊंटन एज एडवेंचर अँड वाईल्डट्रेल्सच्या ट्रेकची मजेशीर आणि   थकवणारी वारी जरूर करावी.  
सर्व ट्रेकर्सचे उत्तम सहकार्य आणिसहभाग यामुळे जाऊन येऊन साडेसोळा किमीचा ट्रेक उन्हाचे चटके देणारा आणि चढाउ टप्प्याचे झटके देणारा परंतु फारच हटके झाला. .