Wednesday 27 September 2017

BirthDay

कोण म्हणतं आपण मोठे होतो  म्हणजे आपलं आयुष्य आपल्या वाढदिवशी एक वर्षानी कमी होतं..मी असलं काही मानत नाही 😊उलट आपला वाढदिवस साजरा करताना हजारो शुभेच्छांचा आणि गिफ्ट्सचा वर्षाव आपल्यावर होतो..आपण आनंदी💃 होतो.सगळी दुःख,अडचणी, दुखणी विसरतो 💃

काल ज्यांनी ज्यांनी मला वाढदिवशी शुभेच्छा दिल्या त्या प्रत्येकाला मनापासून थँक्स ज्यांनी दांडियामध्ये बिझि असल्याने शुभेच्छा नसतील दिल्या त्यानांही प्रत्येकाला थँक्स ..😊रोहित आणि फोना ट्रेकर्स कडून मिळालेल्या तुफानी  शुभेच्छा म्हणजे एका ट्रेकर आणि Blogger चा सन्मान आहे हा..
तसेच
अडागळेंनी दिलेल्या शुभेच्छा म्हणजे एका ट्रेकर blogger ग्रुहिणीचा सन्मान आहे..

गणेश गोसांवी यांनी bday special लिहिलेली कविता म्हणजे आम्हा सर्व ट्रेकर मुलींना मानाचा मुजरा
आहे...👏🏻👏🏻

"Birthday special

जाईन मी जात राहीन मी
शिवशाहीच्या भगव्यासोबत
रानजलाच्या थेंबासोबत
हिरवाईच्या शालूसोबत
रानतळ्याच्या प्रतिमेसोबत
घेत स्वछंदी छबी
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर
जयु आज पुन्हा उभी .....🌿🌿

जाईन मी जात राहीन मी
बुरजावरच्या नजरेसोबत
घाटावरच्या वळणासोबत
हिरकणीच्या शूरतेसोबत
कोसळणाऱ्या धारेसोबत
ना  घाबरता कभी
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर
जयु आज पुन्हा उभी .....🌿🌿

जाईन मी जात राहीन मी
मुक्त मोकळ्या लाटेसोबत
रानफुलाच्या गंधासोबत
खळाळणाऱ्या झऱ्यासोबत
घोंगावणाऱ्या वाऱ्यासोबत
उंच उंच जाईन नभी
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर
जयु आज पुन्हा उभी...🌿🌿

जाईन मी जात राहीन मी
इतिहासाच्या पानासोबत
रानमृदेच्या वासासोबत
स्त्रीत्वाच्या जागरासोबत
शूरांच्या त्या नावासोबत
घेत सवंगडी सभी
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर
जयु आज पुन्हा उभी...🌿🌿"

फोना टिमचे माजी अध्यक्ष रोहित लिखित भन्नाट वाढदिवस शुभेच्छा म्हणजे प्रत्येक ट्रेकर मित्र मैत्रिणीच्या मनातील माझ्याबद्दलच्या भावना आहेत.

"तुफानी गिर्यारोहण लेखक
आसमानी गिर्यारोहक
मिनिटांला ४ dp बदलण्याचा जागतिक पातळीचा विश्वविक्रम करणारे
light च्या speed पेक्षाही कैक पटीने जास्त typing speed असलेल्या
whatsapp व facebook वर धुमाकूळ घालणारे
भिंगरी या सुप्रसिद्ध ब्लॉगचे सर्वेसर्वा
सह्याद्रीच्या गडकिल्ल्यांमधे रमणारे
आयुष्य आनंदाने व बिंधास्तपणे कसे जगावे अशी सर्व तरुणांना प्रेरणा देणारे
फोना ट्रेकर्सचे well known & one n only personality
सौ. दीपु साने मॅडम यांना त्यांच्या प्रगटदिनी सर्व फोना ट्रेकर्सचे सर्व सभासद व लिडर्स तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा....

तसेच काल वाँट्स अप ला लावलेले डि पी,स्टेटस, म्हणजे माझ्यावरचे प्रेम आणि माझी आवड जपल्याचे उत्तम उदाहरण आहे..

तसेच वेळेअभावी अँडव्हान्समध्ये गिफ्ट्स आणि शुभेच्छा देणारे मिनल ,डि.पी,चेतन प्रभू..😊😊thanx guys..
थँक्स..शालीनी,मिनल,मनी,सुषमा,अनघा,अंजली,गिता,रोहिणी,मोहिनी,मनी,निलीमा,आरती,मनिषा,सोनाली,अंजी,सुजी,सूची,अनिता,,निता,नोवा,ऊजू,सुप्रिया,स्नेहल खोल्लम,अस्मिता,रूतुजा,शारदा,ममता,वनिता,
,प्रिया,अर्चना,सुजाता,ललिता,अनुराधा,निता,रश्मी,शुभांगी,सुरेखा,शोभा.कविता,स्मिता,प्रेरणा,पूजा,

फँमिली फ्रेंड्स
एरिया मित्रपरिवार
शालेय मित्र परिवार
ट्रेकर मित्र परिवार
एफ बी मित्र परिवार.आणि आयुष्यातील सर्व मित्र मैत्रीणींनो.😊🙏🏻🙏🏻 मनापासून धन्यवाद..

कितीही मोठे झालो तरी लहान मुलासारखे निरागस आयुष्य जगून बघा ..💃मित्रहो खरंच आयुष्य खूप सुंदर आहे..Thank you each and everyone...😊

Feeling याड लागलंय

Wednesday 13 September 2017

"आनंदाच्या तालावर सैराट झालेली रूपेरी कर्नाटक सहल.."

कर्नाटकी रंगीबेरंगी सहल -भाग २ 
अविस्मरणीय सहलीचे पुढचे ३ दिवस



कर्नाटक राज्याला आधी म्हैसूर या नावाने ओळखले जायचे. या राज्याची सीमा अरबीसमुद्र,उत्तर पश्चिम गोवाउत्तर महाराष्ट्रदक्षिण पूर्व तामिळनाडूदक्षिण केरळला जोडून अशी आहे. कर्नाटक राज्यात जास्तीत जास्त कन्नड भाषा बोलली जाते. तसेच तुळू आणि कोकणी भाषा देखील बोलली जाते.कर्नाटकी शास्त्रीय संगीताला जागतिक शास्त्रीय संगीतात विशिष्ट स्थान आहे. 'फोना" टीमच्या सहलीचे कर्नाटकामध्ये फिरण्यासाठीचे फक्त ३ दिवस होते २ दिवस तर रेल्वेच्या प्रवासातच जाणार होते. त्यामुळे आमच्याकडे तसा वेळ कमी होता. ३ दिवसात जोग फॉलमुरुडेश्वर बीच-गोपुरमगोकर्ण महाबळेश्वरआणि जास्तीचा वेळ असला तर शिरशीच्या गणपती मंदिराला भेट देणेशिरशी याठीकाणी असलेल्या सहस्त्रलिंगचे दर्शन आम्हाला मिळाले तर आमचे अहोभाग्यच होते. कर्नाटक शहर म्हणजे मंदिरांचे शहर आणि स्वच्छ शहर आहे. 
कर्नाटकी रंगीबेरंगी सहलीच्या ब्लॉगच्या  पहिला भागात पुणे ते मुंबईमुंबई ते भटकळ प्रवास आणि कर्नाटकमध्ये पोहोचल्यावर दुपारी भेट दिलेल्या श्री मुरुडेश्वर बीच आणि गोपुरम याचे वर्णन आपण वाचले आता पुढे जाऊयात. 
पहिल्या दिवशी रूमवर पोहोचल्यावर आम्ही तिघी म्हणजे मी, नोवा आणि शोभा दिवसभरात काढलेले आपापल्या मोबाइल मधले  सगळे फोटोज  पाहत बसलो होतो. एकीकडे एकमेकींची उडत उडत ओळख करून घेत होतो कारण आम्हाला ओळखीची गरज आहे असे वाटलेच नाही आमची आधीच गट्टी जमली होती. त्यात निमा विंचू आणि विंचू सर मिळून आम्ही पाच पांडवांसारखे सगळीकडे एकमेकाला न सोडता वावरत होतो. पहिल्या दिवशी जेवताना देखील ३ दिवसाचे रहिवासी असलेल्या हॉटेलमध्ये तो मॅनेजर म्हणत होता ४ लोगोंका टेबल है ४ लोगोंका ग्रुप करके बैठो और ऑर्डर करो. त्याला म्हटलं आम्ही जर पाच जण बसलो तर चलेगा क्या?? ( खरंतर त्यांना मराठी येत नसल्याने आम्ही गपचूप बोलून घेतले तुझं काय खपत का?) पण तिथे त्या गोयंद्याने ४-४ सिटचीच व्यवस्था  केल्याने  ५वि खुर्ची मिळते कुठे?? शेवटी त्या मॅनेजरचीच खुर्ची आणून आम्ही त्या टेबलवर ५ जणांनी एकत्र जेवण केले.
पहिल्या दिवशी रात्रीचे गेले २ वाजले तरी आम्ही गप्पा मारत होतो. काय गप्पा मारत होतो आमचे आम्हाला ठाऊक. आमच्यात मी फक्त फोना सोबत जाणारी एक साधी ट्रेकरशोभा जॉब करणारी आणि कराटे चॅम्पियन. ओळख म्हणून रात्री १ वाजता तिथेच २-४ कराटेच्या किका मारून दाखवल्यावर आम्हाला विश्वास पटला की आपल्याला कर्नाटकमध्ये सुद्धा कोणीतरी बॉडीगार्ड आहे. आमची बाजू सुरक्षित झाली. चुकून हरवलो तरी चिंता राहणार नाही. आमच्यातली तिसरी पार्टनर नोवाची आई येणार होती तीचे कॅन्सल होऊन तिच्याजागी वेळेवर नोवा आली (MBBS,पटकन ऐकणारीउत्तम फोटो काढणारी आणि महत्वाचे म्हणजे फोटो काढायला कधीही न कंटाळणारी. खरे तर आम्ही रूममेट्स असे भारी भेटलॊ होतो एकमेकाला की कोणालाच फोटोचा कंटाळा नाही. पाहिल्याच  दिवशी १००० हुन अधिक फोटोज झाले असतील. त्यात आम्हाला फोटोसाठी उत्तम फोटोग्राफर म्हणून विंचू सर लाभले होते. भारी कॅमेरा त्यात ती दणकट सेल्फी काठी अहाहा क्या बात है...(सोबत एक डॉक्टर, एक फोटोग्राफर, एक बॉडीगार्ड,आणि काळजी घेणारी निमा असले भारी फ्रेंड्स घेऊन मी निश्चिन्त मिरवीत होते.)
आमची हॉटेलवरची कर्नाटकातील पहिली सकाळ ५ वाजून १५ मिनिटांची होती. रात्री २ नंतर झोपलेलो आम्ही कसेबसे उठलो. कारण ७ पर्यंत सगळ्यांनी रूमच्या बाहेर आलेच पाहिजे असा लीडर्सचा आदेश होता. खरंतर झोप झाली नव्हती उठायला जीवावर आले होते पण नाही उठून कोणाला सांगणार? पटापट आवरून तयार झालो बाहेर आलो तर आमच्या अगोदर बऱ्याच लोकांचे फोटोसेशन सुरु होते. आता ट्रिप असल्याने आणि सगळेच मेंबर्स वेळेत येत असल्याने लीडर्ससुद्धा फोटोग्राफीचा आंनद घेत होते.तू माझा फोटो काढ मी तुझा फोटो काढतो अशी देवाणघेवाण सुरु होती.  ती सकाळ रम्य होती सगळ्यांचे फ्रेश,आंनदाने फुललेले उत्साही चेहेरे सहल खूप छान होणार हे दर्शवित होते. हॉटेलच्या गेटवर ग्रुप फोटो काढून नास्ता करायला २ कि.मी वर इंद्रप्रस्थ हॉटेलवर गेलो. तिथले वातावरण अजूनच ताजेतवाने होते. हॉटेल एकदम स्वच्छ होते. त्यांना मराठी हिंदी फार काही समजत नव्हते. आमच्यातील फोनाचे माजी अध्यक्ष आणि लवकरच लग्नाच्या बेडीमध्ये अडकण्याची सज्ज असलेले रोहित सर यांना कन्नड येत असल्याने आम्हाला कसलीही चिंता नव्हती. ते कुडुकुड आमच्या डोक्यावरून जात होते ती गोष्ट वेगळीसगळं कसं सकाळच्या उन्हासारखे सोन्याहून पिवळच होत होतं.
सकाळी नाश्त्याला उडीद वडाइडली सांबारडोसाउपमा शिरा सगळं होतं आणि तेही स्वादिष्ट आणि अनलिमिटेड होते. ज्यांचा आधी नास्ता होईल ते आम्ही तिथेच लहानमुलांसारखी फोटोग्राफी करत असायचो. जे दिसेल तिथे फोटो काढत सुटायचो. सगळ्या वयाची लोकं असल्याने मी तरी सगळ्यांना मुले आणि मुली म्हणत असू तेवढेच सगळ्यांना लहान झाल्याचा आनंद. पोटभर नास्ता केल्यावर आम्ही त्यादिवशीचा जोग फॉलकडे निघालो. जाताना वाटेमध्ये इडगाउंजी या ठीकाणी एक गणपती मंदिर होते तिथले दर्शन घेतले कोणी तिथल्या आठवण म्हणून भेटवस्तू घेतल्या.मी शिवाजीराजेंची प्रतिमा असलेली एक कीचैन घेतली आणि जोग फॉलच्या वाटेल निघालो त्या ठीकाणाहून जोग फॉल सुमारे ८० कि. मी.वर होता. समुद्राच्या बाजूच्या रस्त्याने  आमच्या बसेस जात असल्याने दमट हवामान होते. मधेच समुद्र आल्यावर जरा गार हवा आल्यावर छान वाटत होते. त्यांनतर घाट मार्ग लागला. 
इतका वेळ बसमध्ये नुसतं शांत बसणार आणि इतरांना बोर होऊ देणार हे कोणाच्याच पचनी पडणारे नव्हते. सहलीला आलो तर प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद लुटणे हा माझा नियम मी सगळ्यांना लागू करते आणि केला. मी,रेशमा,निमा,नोवाशोभा बसमधली टेप-गाणी बंद  हळूच गाण्याच्या भेंड्या सुरु केल्यावर सगळेच त्यात सहभागी झाले. धमाल सुरु झाली. एका  मागोमाग आमच्या ३ बसेस मस्त जंगल पार करत निघाल्या. तिकडचे रस्ते एकदम शांत आणि स्वच्छ होते. एकच उणीव होती मराठी/हिंदी सूचना फलक कुठे दिसेल तर शपथ. खरंतर कर्नाटक भाषियांचे त्यांच्या भाषेवरचे ते प्रेम होते.आपण महाराष्ट्रीयन लोक मराठी इंग्लिश आणि हिंदी या तिन्ही भाषांचे सूचना फलक लावतो के जेणेकरून भारतातील प्रत्येक व्यक्तीला आणि भारताबाहेरील व्यक्तीला ते वाचता यावेत. आपण सगळ्यांना सामावून घेणारे महाराष्ट्रीयन आहोत. मग तो कोणत्याही धर्माचा असोते त्यांच्या जागी ग्रेट आपण आपल्या जागी ग्रेटशेवटी सगळे भारतीय आहोत आणि माणूस आहोत हेच खरे. 
दुपारी ११.३० च्या सुमारास आम्ही जोगफॉलच्या जागेवर पोहोचलो त्यावेळीचा आनंद शब्दात सांगणे कठीण आहे. कर्नाटकातील सर्वात मोठा मानला जाणारा आणि उंचावरून कोसळणारा तो पाण्याचा प्रवाह  आहे. कर्नाटकातील शरावती नदीच्या प्रवाहातून पुढे चार प्रवाह तयार होतात आणि ८२९ फूट खाली कोसळताना दिसतात. अतिशय सुंदर, मनमोहक, डोळ्यांना सुख देणारे आणि मनाला आनंद देणारे ते दृश्य होते. या कोसळणाऱ्या चार धारांना राजा,रोअर,रॉकेटराणीअशी चार नावे दिली आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांकडून या ठिकाणी ऊर्जा प्रकल्प बनवले आहेत. तेथील एका ऊर्जा प्रकल्पाला देखील आम्ही दुरून भेट दिली. डोक्यावर कडाक्याचे ऊन झेलत होतो आणि एकीकडे त्या उंचावरून कोसळणाऱ्या त्या चार महाधारांचा नजारा पाहत होतो. त्या ठिकाणचा फोटो काढून व्हिडीओ बनवण्याचा मोह आमच्यातील एकालाही आवरला नाही. लाखांनी फोटोज काढले असतील. सह्याद्री रांगेच्या दक्षिण भारताच्या पश्चिम घाटामध्ये शिमोगा जिल्ह्यामध्ये हा जोग फॉल पहावयास मिळतो.२ दिवस अगोदर महाराष्ट्रात पावसाने जो कहर केला होता तितका पाऊस असता तर त्या जोग  धबधब्याचा प्रवाह आणिक वाढलेला असता आणि ते दृश्य अजून जास्त छान, जोरदार, जबरदस्त वाटले असते. 

या अगोदर या ठिकाणी फोनाची सहल गेली असताना या जोग फॉलचे चित्र खूप वेगळे होते. समोर कोसळणाऱ्या धारांचा प्रवाह इतका जोरदार होता की आम्ही जिथे फोटोग्राफी करत होतो तिथपर्यंत ते पाण्याचे तुषार उडत होते. तरीही जे दृश्य आम्ही पहिले ते सगळ्यात छान होते. अवर्णनीय होते. १२ वाजून गेले होते जेवणाची वेळ होत आली होती. परंतु आमच्या लीडर्सने तिथे असलेल्या जोगव्हॅलीमध्ये ज्यांना जमेल त्यांनी पटकन जाऊन येऊ असे सांगितले. पटकन जाऊन येऊ म्हणजे थोडेसे जवळच एखादा पिकनिक पॉईँट असणार असे आम्हाला वाटले.
आम्ही फोटोग्राफी करत असताना २ लीडर्स आणि अजून ३-४ इच्छुक मेंबर्स पुढे गेले देखील. "हम पाँच ढुंढते ही रह गये." जोग फॉल परिसर खूपच मोठा आणि अप्रतिम आहे. आमच्या  फोनाच्या  सहलीचे आयोजक श्री नितीन पवार सर यांनी आमच्या ६० लोकांच्या जेवणाची सोय आधीच केली होती परंतु ऐनवेळी त्या तिथल्या जेवण बनवणाऱ्याने तिथे आलेल्या २०० लोकांच्या ग्रुपमुळे आमचे जेवण कॅन्सल करून त्यांना दिले.  लीडर्स आणि  सगळ्यांचाच राग अनावर झाला. अशी ऐनवेळी फजिती करणाऱ्या लोकांना आणि थोड्या फायद्यासाठी चांगल्या लोकांना फसवणाऱ्या लोकांना अद्दल घडवायला हवीच. परंतु आम्ही दुसऱ्या राज्यात होतो. आता त्रागा करून काही उपयोग नव्हता. वेळेवर असा  प्रसंग येऊ शकतो त्यातून कसा मार्ग काढायचा हे 
'फोना" च्या लीडर्सना पक्के माहिती आहे. "फोना लीडर्स रॉक्स." आम्ही सगळे फोटोग्राफ़ी मध्ये मग्न असतानाच तात्काळ तिथे असलेल्या दुसऱ्या जेवण बनवणाऱ्या स्थानिकांना ६० लोकांच्या जेवणाची ऑर्डर दिली आणि त्यांनी लगेच जेवण बनवून वाढणास सुरूही केले. कारण अश्या मोठ्या पर्यटनस्थळी तेथील लोकांना अंदाज असतोच की वेळेवर कितीही लोकांचे जेवण बनवावे लागू शकते आणि तोच तिथला मुख्य व्यवसाय असल्याने बऱ्यापैकी तयारी आधीच दिसून आली. एकीकडे लोक जेवण जेवायला सुरु करत होते एकीकडे काही लोक लीडर्सच्या नावाने शंख करीत होते.लीडर सुद्धा माणूसच असतो त्यालाही वेळेवर काहीतरी तरतूद करावीच लागते. त्यामुळे दुपारच्या जेवणाला थोडासा उशीर झाल्यामुळे इतरांनी समजून घ्यायला हवे.  तितक्यात आम्ही तिंघी व्हॅलीचा मार्ग विचारून व्हॅली उतरावयास लागलो. खूप लोक ती जोगफॉलची व्हॅली चढत आणि उतरत होते. तसेच शाळेच्या मुलांची सहल आली होती ती मुले देखील पटापट उतरताना दिसली त्यामुळे हा एखादा छोटा पिकनिक पॉईंटच असेल असे वाटले होते. आम्हाला आमचे लीडर्स काही दिसेनात. आमच्यातले काही लोक परत येताना दिसले. आम्ही तिघी उतरत गेलो उतरत गेलो. सिमेंटच्या पायऱ्या बनवल्या होत्या त्याने खूप पाय दुखू लागले होते. किती खाली उतरायचे याचा अंदाज नव्हता कारण नुसत्याच पायऱ्या दिसत होत्या आणि मधूनच जोग फॉल दिसला की हायसे वाटायचे. मधेच काही १८-२० वयोगटामधील मुले या व्हॅलीतून चढत होती ते मला म्हणाले,"मॅम, आप मत जावो चढ नहीं पाओगे." तरीही आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत उतरत राहिलो आणि आमचे लीडर्स दिसेपर्यंत उतरतच राहिलो. शेवटचा टप्पा पार करताना खूप दमायला झाले होते. शिवाय मला आत्ताच उतरलेल्या पायऱ्या चढण्याची काळजी वाटू लागली कारण माझ्याकडे फक्त अर्धी बाटली बिसलेरीचे पाणी होते. ते मी अक्षरशः स्टोलमध्ये लपवून ठेवले होते.(sorry फ्रेंड्ज माझ्याकडे पर्याय नव्हता.)  मी नोवा आम्ही खाली उतरत गेलो शोभा अर्ध्यातून परत गेली होती कारण खरंच उतरताना भारीच दम लागत होता आणि चढताना काय हालत होणार याचा अंदाज आल्याने बरे झाले शोभा तू परत गेलीस. पुढच्यावेळी तुला सोबत नेऊ हो.  तिकडे खाली उतरल्यावर धबधब्याच्या पाण्याशिवाय प्यायचे पाणीच नव्हते आणि पोटाच्या इन्फेक्शनमुळे मी यावेळी किमान सहल संपेपर्यंत तरी बिसलेरी पाण्याशिवाय पाणी पिण्याचे टाळले. आणि यात मला माझ्या पाच पांडवांनी खूप मदत केली. मला बिसलेरीशिवाय पाणी पिऊ दिले नाही. थँक्स शोभा, नोवा, निमा, आणि विंचू सर आणि रोहित सर.  आम्ही व्हॅलीमध्ये उतरलो तिथून दिसणारा तो जोग फॉल अजूनच अप्रतिम दिसत होता. पांढरा कापूस हवेत उडतो आहे असा भास होत होता. तिचे गेल्यावर समजले की मंदार सर राणे सर नवीन शिर्के आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या दोन लेडीज त्यात एक त्या साडी घातलेल्या जयश्री काळोखे ग्रेट होत्या.  साडी आणि चप्पल वर त्या दरीत उतरल्या होत्या. जयश्री काळोखे सलाम तुम्हाला.त्यांना पाहून मला के टू एस ला साडीवर आणि साध्या बुटांसोबत आखा कात्रज ते सिहंगड ट्रेक आढाव मॅडमने बिनधास्त पूर्ण केला होता ते आठवले. महत्वाचे म्हणजे जोगफलच्या व्हॅलीमध्ये मोठ्या कष्टाने पोहोचण्याच्या टीम मध्ये मुलींची संख्या जास्त होती. 
फोना टीमच्या मुली रॉक्स. सुमारे ८३० फूट खोल दरीमध्ये भर उन्हात १ वाजता उतरणाऱ्यांचे अभिनंदन आणि कौतुक. मीनोवाज्ञानदाजयश्री काळोखेमंदार सरराणे सरनवीन शिर्केसुप्रिया शेवाळे आणि अजून २-३ जणांची नावे ठाऊक नाहीत.   इतके जण ती खोल व्हॅली उतरलो आणि लगेच चढलो.  व्हॅलीतून जोग फॉल मानसोक्त अनुभवून घेतला आणि लगेचच १० मिनिटांमध्ये लीडर्सने व्हॅली चढण्याचा आदेश दिला. आम्ही त्या जोग फॉलचे पाणी तोंडावर मारले आणि ग्रुप फोटो घेऊन लगेचच निघालो. मी ज्ञानदामंदार सर पुढे निघालो होतो परंतु कोणाला तरी व्हॅली चढताना खूप त्रास होऊ लागला आणि मंदार सर मागे थांबले. अशा अनोळखी ठिकाणी कृपा करून कोणी ट्रेकिंगची सवय नसेल स्वतःचा स्टॅमिना माहित नसेल तर बिलकूल दारी उतरायचे धाडस करू नये.  मंदार सर आणि इतर लीडर्स केव्हाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्यासोबत आलेल्या मेंबर्सना सोडून येत नाहीत.उलट काहीतरी क्लुप्ती करीत गोड बोलून थोडेच अंतर राहिले आहे असे सांगत ट्रेक पूर्ण करवून घेतात.मला तर खुप त्रास होत होता पण माझ्यामुळे मी उशीर होऊ दिला नाही ज्ञानदा, मी, राणे सरांसोबत १ मिनिटांचा उभ्या उभ्या थांबा घेत ३ वाजता व्हॅली चढलो. आणि क्षणभर बसलो होतो त्यावेळी आम्ही चढत असताना उतरणारी एकमेव मुलगी होती सुप्रिया शेवाळे.  ती दरीत उतरताना इतक्या 1385 पायऱ्या मोजत-मोजत उतरली होती. हॅट्स ऑफ सुप्रिया. आम्ही वर येऊन बसतोय तोवर ती आली देखील काय वेग असावा तिचा. आणि त्यात ती जेवण करून लगेच उतरली होती. मस्त सुप्रिया, मानले बाबा तुला मी. 
सुप्रिया आम्ही सगळे लगेच जेवायला गेलो थोडा रस्सम भात खाल्ला. कोणी आईस क्रीम खाल्ले,पान खाल्ले आणि त्यानंतर मागे राहिलेल्या मेम्बर्सना घेऊन मंदार सर आले. व्हॅलीमध्ये उतरताना काहीच अंदाज नसल्याने उतरत गेलो आणि एक दोघं मेंबर्सना सांभाळून आणताना जरा उशीर झाला. इकडे बाकी लोकांनी काहीतरी गोंधळ घातला होता.लीडर्सना आणि आयोजकांना बरेच काही ऐकावे लागले. कारण पुढच्या ट्रिपला उशीर झाला होत असल्याने २ बसेस जेवून पुढे निघाल्या आमची एक बस मागे राहिली. आमची बस चार वाजता तिथून निघाली भर उन्हात ट्रेक पूर्ण केला आणि खाली दरीमध्ये खूप ऊन असल्याने आणि वेळेअभावी फक्त १० मिनिटे थांबून लगेच ८३० फूट वर त्या १३८५ पायऱ्या आम्ही चढलो आणि लगेच घाटामध्ये प्रवास केल्याने मला थोडा त्रास झाला आणि दुपारचे जेवलेले सगळे बाहेर आले पण त्याला फक्त १० मिनिटे गेली असतील.काहींनी माझ्यामुळे उशीर झाला त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी हे सांगत आहे की माझ्यामुळे कसलाही उशीर झालेला नाही. मंदार सर आणि डॉ. नोवा मनापासून धन्यवाद . नोवा माझी पाठ चोळत उभी होती आणि मंदार सर पाणी घेऊन उभे होते. या कौटुंबिक वातावरणामुळेच  फोना ग्रुप सोबत मला पाठविले जाते. थँक्स फोना टीम. 
आमचा प्रवास चालू होता संध्याकाळ होत आली होती लाल संधिप्रकाशाने आकाश लालसर झाले होते परंतु घनदाट जंगलामुळे ते सुंदर आकाश अधून मधून दिसत होते.  अंधार पडू लागला आता आम्हाला गोकर्ण बीचवर जाता येणार नाही हे समजून होतो आम्ही परंतु त्याहून जोग फॉलच्या व्हॅलीत उतरून क्षणात ती व्हॅली चढण्याचा आनंद स्वर्ग सुखाहून जास्त होता. त्यावेळी गणपती विसर्जनाची मिरवणूक निघाल्याने आम्हाला बाप्पानी दर्शन दिले.
त्या मिरवणुकीमधील आमच्या पुढे गेलेल्या मेम्बर्सनी तिथल्या कलाकारांच्या छान छब्या टिपून घेतल्या आहेत.  पण मिरवणुकीमुळे आम्हाला उशीर झाला हे मात्र खरे. आम्ही गोकर्ण महाबळेश्वरला पोहोचलो तेव्हा आमच्या दुसऱ्या दोन बसेस त्या ठिकाणाहून निघाल्या होत्या.
x

गोकर्ण म्हणजे गायीचा कान. कर्नाटकच्या उत्तरकन्नड जिल्ह्यातले दोन नद्यांच्या मिलनातून कानासारखा आकार निर्माण झालेल्या ठिकाणी वसलेले गोकर्ण महाबळेश्वर हे हिंदू धर्मियांचे पवित्र स्थळ म्हणून जसे प्रसिद्ध आहे तसेच येथल्या सुंदर सम्रुद्रकिनार्‍यांसाठी पर्यटकांचेही आवडते स्थळ आहे. गोकर्णला गोव्यातून जसे जाता येते तसे अन्य ठिकाणांहूनही जाता येते. एका बाजूला पश्चिम घाटाचा डोंगरी भाग व दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र यातून जाणारी गोकर्णची वाट पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालते.गोकर्णला पाहायचे ते महाबळेश्वर मंदिर आणि महागणपती मंदिर. मुख्य रस्त्याच्या पश्चिम टोकाला असलेले महाबळेश्वर हे शिवमंदिर अतिशय सुंदर आणि भव्य आहे. येथे शंकराचे आत्मलिंग किवा अमृतलिंग पिंडस्वरूपात आहे आणि गाईच्या कानाच्या आकारात आत हे लिंग आहे. बाहेरून पाहताना याचे स्पष्ट दर्शन अवघड होते हे खरे पण या मंदिरामागची कहाणी अतिशय सुंदर आहे.
असे सांगितले जाते की रावण मोठा शिवभक्त होता. शंकराची आराधना करून कडक उपासना करून त्याने शंकराला प्रसन्न करून घेतले. शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी रावणाला तुला काय देऊ असे विचारले तेव्हा रावणाने शंकराला आत्मलिंग मागितले. आत्मलिंग ज्याच्याजवळ त्याला मृत्यूचेपराभवाचे भयच नाही. भोळ्या सांबांनी आपले आत्मलिंग रावणाला दिले पण एक अट घातली की लंकेत पोहोचेपर्यंत हे लिंग जमिनीवर टेकवायचे नाही. रावण आत्मलिंग तळहातावर घेऊन आकाशमार्गे लंकेकडे निघाला. पण त्यामुळे देवलोक चिंतेत पडले. आता रावण अजिंक्य होणार. कांहीतरी करून लिंग परत आणले पाहिजे. शेवटी गणपतीने हे आव्हान स्वीकारले. समुद्रकिनार्‍यांवर तो गुराखी होऊन आला.रावणाच्या मार्गातच हे ठिकाण होते. दरम्यान रावणाला लघुशंका आली. पण लिंग जमिनीवर ठेवायचे नाही आणि लिंग हातात असताना लघुशंका करणार कशीत्याला मोठा प्रश्न पडला तोपर्यंत गुराखीरूपातला गणपती त्याला दिसला.
रावण खाली उतरला आणि गुराख्याला थोड्यावेळासाठी लिंग सांभाळायला सांगितले तेव्हा गुराखी म्हणाला तीन म्हणायच्या आत आला नाही तर मी हे लिंग येथेच ठेवून जाईन. रावणाने अट मान्य करून तो लघुशंकेसाठी गेला. हे पाहताच गणपतीने तीन आकडे मोजले आणि लिग गाईच्या कानात ठेवले. घाईघाईने परत येऊन रावणाने ते लिंग घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा गाय जमिनीत अदृष्य झाली पण तिचा कान रावणाच्या हातात आलो तो जमिनीत रूतला. रावणाला तो बाहेर काढता आला नाही आणि शेवटी आत्मलिंग गाईच्या कानात तसेच राहिले. तेथेच भव्य शिवमंदिर उभारले गेले. या मंदिराजवळच हुषारीने आत्मलिंग परत मिळविणाऱ्या गणेशाचे महागणपती मंदिरही आहे. दरवर्षी हजारो भाविक या स्थानाला भेट देत असतात. येथेच श्राद्धविधीही केले जातात
गोकर्णला पाच बीच आहेत आणि डोंगरावरून पाहिले असता हाताची पाच बोटे पसरावीत तसे हे किनारे दिसतात. सर्वात प्रमुख असलेला ॐ किनारा प्रेक्षणीय. हिंदू धर्मियात अतिशय पवित्र मानले जाणारे ॐ  चिन्हाच्या आकाराचा हा किनारानिळाशार समुद्र डोळ्यांना पुरेपूर तृप्त करतात. येथे जाण्यासाठी चांगला काळ म्हणजे आक्टोबर ते फेब्रुवारीचा.राहण्यासाठी अनेक लॉज आणि धर्मशाळा आहेत. जेवणाखाण्याच्याही सोयी चांगल्या आहेत. तेव्हा एकदा गोकर्ण महाबळेश्वरला नक्की भेट द्या.
आम्ही पटापट उतरून तेथील शिव मंदिरात जाऊन दर्शन घेतले ते मंदिर ८ वाजताच बंद होते तिथे आम्हाला आरती मिळाली. मला मात्र काही सुचेना झाले होते. थ्रोट इन्फेकशन वाढले होते बोलता येत नव्हते. तिथे नारळ पाणी घेतले ते सुद्धा पिता आले नाही. उशीर होणार असल्याने तिकडचे आम्ही जेवायला जाणारे हॉटेल आम्ही तिकडे पोहोचेपर्यंत बंद होणार याचा अंदाज आल्यावर लगेच लीडर्सने दुसऱ्या ठिकाणी आमची जेवणाची सोय केली. आम्ही रात्री एका ठिकाणी १०:३० वाजता जेवण केले. मी घसा  शेकवण्यासाठी गरम पाणी मागितले असता तिथल्या एका वेटरने मला मीठ आणि कडक पाणी लगेच आणून दिले गुळण्या केल्यावर जरा बरे  वाटले. त्या हॉटेल मध्ये जेवण छानच होते.तितक्या रात्री पटपट ऑर्डर्स घेऊन आम्हाला जेवण दिले गेले. तिथे मस्तानी आईस्क्रीम सारखा एक प्रकार होता त्याचे नाव गडबड होते. ते सर्वांना फारच आवडले. बऱ्याच लोकांनी ते मागवून खाल्ले.
जेवण करून आम्ही रात्री १२:१५ राहत्या हॉटेल वर पोहोचलॊ. खूप थकलो होतो. आमच्यात फोटो पाहण्याचे देखील त्राण नव्हते. दुसऱ्या दिवशी आम्हाला  पॅकअप करून निघालायचे असल्याने मोठ्या कष्ठाने आम्ही जड अंत:करणाने आमच्या सॅक पॅक केल्या आणि  रात्री १ ते २  वाजता  पुन्हा सकाळी उठण्याचा नंबर दुसऱ्याच्या नावी झटकून झोपी गेलो. 
सकाळी ५:३० उठून पटापट तयार होऊन दुसऱ्या दिवशीचा स्पॉट 'YANNA रॉक" पाहण्यासाठी आमच्या पूर्ण तयारीत होतो. फोना ब्यानर फोटो आणि आमच्या बसच्या ड्राइवर भाऊसोबत सोबत ग्रुप फोटो काढून आणि आदल्या दिवशीच्याच इंद्रप्रस्थ हॉटेल मध्ये सकाळचा नास्ता करून  आम्ही YANNA रॉक" च्या वाटेला निघालो. आज मात्र माझा घसा  दुखत होता तरीही उत्साह तोच होता त्यामुळे डॉ.  रेश्मा,मनीषा, निमा शुभांगी मॅम नोवा, शोभा मीमंदार सर, राणे सर, रोहितसुमित म्हेत्रेमिस्टर रणसिंग,डॉ. बाहेटी डॉ. राजेंद्र कुलकर्णी, नवीन शिर्केविंचु सर, विश्वासकाका आणि सगळेच यांची आमच्या गणेश बसमध्ये आता मस्त टीम तयार झाली होती. आज सहलीचा शेवटचा दिवस आहे आज जास्त धमाल करू असे ठरवून अंताक्षरी सुरु केली. शुभांगी मॅमने  त्यांच्या मधुर आवाजात सुंदर जुनी मराठी गाणी म्हंटली तसेच त्यांना विश्वास काकांनी छान सोबत केली. राजेंद्र कुलकर्णी यांची तर जुनी हिंदी मराठी गाणी राणे सरांसारखीच तोंडपाठ होती. क्या बात है एकाहून एक भारी गायक आज आम्हाला लाभले होते . आज विंचू सर आणि  इतर सगळेच सुरात गात होते. उलट आम्हीच आमची गाणी बाजूला ठेवून त्यांची गाणी ऐकली. आते राहो गाते राहो. "YANNA रॉक" इथून सुमारे ६५ कि. मी. वर होते.आमच्या बसेस मागेपुढे होत होत्या त्यामुळे एका ठिकाणी थांबून पुन्हा बस आल्यावर पुढचा प्रवास सुरु व्हायचा. थांबलो की फोटो सेशन झालेच म्हणून समजा.  पुन्हा तेच कारवारचे घनदाट हिरवेगार जंगल पार करत यांना रॉकचा स्टॉप केव्हा आला समजलेच नाही. बसेस थांबून आम्ही खाली उतरून चालायला सुरु केले.त्या कुमटाच्या जंगलात थंडगार हवा आणि  झुळू झुळू वाहणारे झऱ्याचे पाणी याचा सुंदर मिलाप झाला होता. सगळ्यांचे चेहरे ताजेतवाने होते. आणि उत्साह त्याहून जास्त होता. "YANNA रॉक" चे सुमारे ३ कि. मी चे अंतर कसे कापले ते आमचे आम्हालाच कळले नाही. यांना रॉक पाहिल्यावर निसर्गाचा अजून एक अद्भुत, सुंदर चमत्कार पहावयास मिळाला याची अनुभूती आली. 

"YANNA रॉक" हे गाव कुमटा जंगलाच्या हद्दीत आहे. कारवारच्या जंगलापासून ६० कि.मी अंतरावर आहे. "YANNA रॉक" म्हणजे नैसर्गिक ज्वालामुखी बाहेर येऊन त्याचा मोठा खडक तयार झाला आहे आणि हा खडक अतिशय सुंदर आकारामध्ये तिथे उभा आहे. शिवाय त्यात एक मोठी गुहा तयार झाली आहे. असे दोन खडक तयार झाले आहे . एकल भैरवेश्वर  शिखर म्हणतात आणि एकाला मोहिनी शिखर म्हणतात. भैरवेश्वर शिखरांची उंची सुमारे १२० मीटर इतकी आहे आणि मोहिनी शिखराची उंची ९० मीटर इतकी आहे. आम्ही काही जण तिचे पोहोचलॊ तेव्हा दुपारचे बारा वाजले होते. तिथले असणारे पुजारी आम्हाला म्हणाले चपला सॉक्स काढून गुहेत जाऊन या ते बंद होईल. अरे बापरे आमचे बाकीचे लोक तर अजून यायचे होते. जर ही गुहा बंद झाली तर इतक्या दूर येऊन काय उपयोग होता. त्या जंगलात म्हणे जळवा खूप आहेत असे ऐकले होते त्यामुळे मी घाबरून अंगात जॅकेट घातले होते आणि बूट काढले पायातून पण त्या जळवांच्या भीतीने सॉक्स काही पायातून काढले नाही आणि सुप्रिया शिल्पा मी आणि अजून ३ जण त्या गुहेत जाऊ लागलो. गुहा अप्रतिम होती. इतकी उंचच उंच अवाढव्य आणि अप्रतिम गुहा मी आतापर्यंत तरी पहिली नव्हती ती पहावयास मिळाली.

शंखनाद आणि घंटानादाचा आवाज येऊ लागला. मी तर चक्रावूनच गेले. नेमका आवाज येतो कुठून हे समजेनाच. शेवटी "YANNA रॉक"ची एक कि. मी. ची प्रदक्षिणा पूर्ण झाली मोहिनी शिखर सुद्धा पाहिले तेव्हा समजले की तिथे कालभैरवाचे मंदिर आहे ते बंद होणार होते. गुहा वैगेरे काही बंद होणार नव्हती. त्यामुळे आमच्या सगळ्या मेम्बर्सना निवांत गुहेत जात आले  आणि कालभैरवाला प्रदक्षिणा मारता आली.
मी त्या कालभैरवाच्या मंदिरातून एक शंख वाजवून पाहिला मला तो थोडा तरी वाजवता आला आणि मगच मी तो शंख"YANNA रॉक" ची एक आठवण म्हणून विकत घेतला. निमानोवाशोभाविंचु सर मात्र माझ्या पासून खूप दूर राहिले होते. आता आम्ही सुप्रिया, शिल्पा, पल्लवी,शुभांगी मॅम, विश्वास काका, निकाळजे  सरआणि अजून इतर लोक सोबत चालत होतो. स्मिता म्हणजे प्राणी पक्षी पाने फुले यांचे फोटोज काढणारी तर आम्ही निसर्गासोबत माणसांचे फोटोज काढणारे सोबत चाललो होतो
काहींना ते ३कि.मी. अंतर चढाव असल्याने चालण्यास त्रास होत होता त्यामुळे फोना टीम ची एक बस २ कि. मी. आतापर्यंत आणली गेली त्यात ते सगळे बसून गेले. आदल्या दिवशी आम्ही ट्रेकमुळे दमलेलो होतोच त्यामुळे आता आम्ही देखील जरा दमलोच होतो. परंतु आम्हाला त्या बसेपर्यंत ३ कि.मी अंतर चालूनच जावे लागले. सगळे मेंबर्स आल्यानंतर रेशमाप्रमिला यांच्याकडे घरून आणलेले बेसन लाडू आणि बुंदीच्या लाडूने आमची थोडी भूक शमवली. आमच्या बस आता जेवणाची प्रतीक्षा करत हुबळी रेल्वे स्टेशन कडे निघाल्या होत्या. ३ तासाचे जंगल पार करून आम्ही ४ च्या सुमारास एका ठिकाणी जेवणासाठी थांबलो. तिथे जेवण केल्यावर त्या ठिकाणी शो केस मध्ये सेल साठी असलेल्या कर्नाटकी साड्या घेण्याचा मोह मुलींना आवरला नाही. 
तिथे त्या हॉटेलमध्ये इटालियन जातीचे एक कुत्रे आम्हाला पहावयास  मिळाले.अवघे ७ महिने वय असलेले ते कुत्रे भले मोठे दिसत होते. जेवण आवरून आम्ही हुबळीकडे निघालो होतो. येताना जर जास्तीचा वेळ असला तर मध्ये शिरशी या गावी गणपती मंदिराजवळ सहस्त्रलिंगांचे दर्शन मिळाले असते परंतु वेळेअभावी आम्ही शिर्शी येथे वळलो नाही. संध्याकाळी एका ठिकाणी चहा घेऊन आम्ही निघालो. दुपारी जेवल्यानंतर आता कर्नाटकमधील बसचा शेवटचा प्रवास थोडा होता सगळे लीडर्स एकेक बस पुढे सोडीत अनावधानाने आमच्या बसमध्येच येऊन बसले.  मधल्या प्रवासात अंताक्षरी सुरूच होती. हुबळी स्टेशन यायला अर्धा तास बाकी होता. त्यावेळेची रेशमा रणसिंग हिने मला सांगितले की आता थोडा वेळ राहिला आहे तर आता मस्तपैकी झिंगाट झाला पाहिजे. मी वेळ वाया न घालवता शोभारेशमा आणि नोवाला म्हंटले आता एकेक करून सगळ्यांना नाचवायचे मग तो कोणी असो. सकाळी बस मध्ये लावलेली गाणी आधी सुरु केली. औंदा लगीन करायचंतुझ्या पिरतीचा विंचू मला चावलाशांताबाय आणि अर्थात सैराटचे झिंगाट गाणे झाल्याशिवाय नाच पुरा होऊच शकणार नाही. गाणे लावल्यावर आम्ही ५ जणींनी आधी आमचीच पावले बसूनच  थिरकवायला सुरु केले आणि ड्राइवर सीट जवळ बायकोच्या आठवणीने झुरत बसलेल्या रोहितला मंदार सरांनी आधी उचलूनच आणले.(आम्हाला काही तो ऐकला नाही) सगळ्यात आधी नाचायला सुरु केले ते आमच्या बस मध्ये असलेले डॉ. परांजपे काकांनीमग औंदा लगीन करायचे या गाण्यावर रोहितला नाचवले आणि रोहित नाचला,👌👌😊 नंतर मग विश्वास काकामग शुभांगी मॅममग विंचू सरनिमामनीषा आणि मनीषाचे मिस्टर,राणे सरमंदार सरसुमित म्हेत्रेडॉ. बाहेटी,डॉ. कुलकर्णीमिसेस परांजपेनवीन शिर्केनोवाशोभा सगळेच नाचून नाचून झिंगाट झाले. रेशमा  आणि तिचे मिस्टर तर कोणी बघत नाही आपल्याला असे समजून त्यांनी तर डीजे डान्स केला. डान्सचे क्रेडिट रेशमा आणि शोभा यांना.  त्या २०  सीटरच्या बसमध्ये नाचायला जागा नव्हती तरीही सगळे रंगात आले होते आणि आपली दडून बसलेली कला बाहेर काढत होते. बसचा ड्राइवर पण खूप मजेत होता कारण त्याला असे धमाल करणारे लोक मिळाले होते. सगळे झिंगाट झाले असतानाच  ७:३० च्या सुमारास हुबळी स्टेशनवर पोहोचलो सगळ्या बसेस सोबत आम्ही फोना ग्रुप फोटो घेतला आणि हुबळी स्टेशन मध्ये प्रवेश केला. हुबळी स्टेशन म्हणजे एक विमानतळच आहे असे भासत होते इतके स्वच्छनीटनेटकेप्रकाशमान होते ते. आम्ही वेटिंग रूम मध्ये आमच्या सॅक ठेवून जरा फ्रेश झालो आणि स्टेशनवरच जेवणासाठी आलो. उशिरा जेवल्याने सगळ्यांनाच भूक नव्हती त्यामुळे काहींनी पार्सल घेतले. आम्ही जूस घेतला. आमची एक्सप्रेस अगदी वेळेत होती.आम्ही  तिथले कंधीपेढे  आणि थोडी मिठाई घेऊन हुबळीलाचा निरोप घेऊन  एक्सप्रेसमध्ये बसलो. गाडी सुटायला थोड़ा अवधी होता. माझी बँग फारच जड झाली होती त्यामुळे आणि माझे रूममेट्स मला सोडून हुबळी स्टेशनवर फोटो काढून आले त्यामुळे माझी खूप चिडचिड झाली होती.नंतर ट्रेनमध्ये बसल्यावर आम्ही  गप्पा मारत आमचे फोन चार्जिंगला लावले तितक्यात शिल्पाचा फोन एकाने मारून तो चोर पळू लागला. जोरात चोर चोर चा आरडाओरडा झाला सगळे त्या चोराच्या मागे धावले शोभा तर बिनाचप्पल पळत जाऊन चोराला धोपटणार तितक्यात चोराने मोबाईल आणून दिला. चोर वैगेरे काही नव्हता तो. ते आमच्यातलेच एक मेंबर होते श्री गुंजाळ. थोडी अशीही गंमत. नितीन सर जरा चिडले की अशी थट्टा करू नये. पण मिस्टर गुंजाळ तुम्ही जरा छान  थरार अनुभववला. असे घडू शकते याचे उत्तम उदाहरण दिले. नितीन सर तुम्ही तुमच्या जागी बरोबर होतात. गुंजाळ तुम्ही तुमच्या जागी बरोबर होतात. आमची गाडी १० वाजता सुटली आपापल्या जागा पकडून सगळॆ सामान जागेला लावून आम्ही झोपून जाण्याचे ठरविले परंतु आता भूक लागल्याने झोप येत नव्हती.विमानतळाप्रमाणे असणाऱ्या  हुबळी स्टेशनवर आम्हाला थोडी फोटोग्राफी करायची होती आणि शोभा मला सोडून फोटो काढून आल्याने मी तिच्यावर जरा रागवले होते नंतर मग पुन्हा गाडी रुळावर आली. तयारीचे १२ वाजता मी प्रमिला आणि मिस्टर गुंजाळ यांनी मिळून तिच्या घरचे बुंदीचे लाडू खाल्ले तेव्हा कुठे जरा झोप यायला लागली.त्यावेळी आमच्या हसण्याच्या आवाजावरून आमच्या सोबत पुण्याला जाणारे एक म्हातारे जोडपे होते त्यांचे मात्र आम्हाला बोलणे खावे लागले. पण गुंजाळांनी त्यांना मस्त गॉड भाषेत ठणकावून सांगितले.  मग मात्र सगळेच झोपले. . "डायरेक्ट चिल्लाने का नाही. पहले अच्छे से बात करना सीखो. प्यार से बोलो फिर हमें बताओ. और इतनी तक्लीफ होती है तो एसी का बुकिंग करने का" मग ते जोडपे गप्प बसले आणि आम्ही पण गप्प बसलो. सहल संपत आल्याने सगळेच शांत झाले होते. रात्री १ वाजता झोप लागली असेल ती सकाळी ६ वाजता ट्रेन मधल्या सारख्या फेऱ्या घालणाऱ्या चहावाल्याच्या आवाजाने जाग आली तेव्हा दौंड स्टेशन आले होते.काही कारणाने  ट्रेन बराच वेळ मधेच थांबली होती. ९ व्दच्या दरम्यान पुणे स्टेशन वर पोहोचलो आणि मग इथून आम्ही ट्रेन नेबस नेकॅब ने आपापल्या घरी पोहोचलो. ६० जणांचा इतका मोठा ग्रुप म्हंटल्यावर वेळेचा थोडाफार इकडे  तिकडे होणारच.
माझ्या दृष्टीने म्हणाल तर आमची कर्नाटक सहल सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि लीडर्सच्या उत्तम नियोजन आणि कार्यवाहकांच्या उत्तम कार्यामुळे उत्तम रित्या पार पडली.  फोना ग्रुपचे माजी अध्यक्ष आणि लाईफ मेंबर मंदार थरवळमाजी अध्यक्ष रोहित सरफोनाचे मेंबर राणे सर, हजारो साप पकडून त्यांना सुरक्षितरित्या जंगलात सोडणारे सर्प मित्र निकाळजे सरनितीन पवार सर यांना खास धन्यवाद आणि हॅट्स ऑफ "फोना टीम" इतक्या भल्या मोठ्या  ग्रुपची सहल अरेंज करून नाना तऱ्हेच्या लोकांना झेलून वेळ प्रसंगी बोलणी खाऊन डोकं शांत ठेऊन ती सहल सुखरूप पार पाडणे  मोठ्या कौशल्याचे कार्य आहे आणि कौतुकास्पद कार्यं आहे. सगळ्या सहलीच्या मेंबर्सना मनापासून धन्यवाद. या वेळीसुद्धा वेळेअभावी माहिती परेड राहून गेल्यामुळे मला सगळ्यांची नावे टाकता आली नाहीत. त्यासाठी पुन्हा पुन्हा फोनाच्या ट्रेक आणि ट्रिपला येत रहावे हा यावरचा उत्तम उपाय आहे.  उत्तम फोटोग्राफर विजू काकाविंचू सरभूषण,ह्रिषीकेश,स्मिता बांदल,निसर्गप्रेमी पल्लवी शेवाळे,रोहित, सुप्रियानोवा आणि सर्वच जणांनी उत्तम फोटोग्राफी करून फोटोरूपात सहलीच्या आठवणी शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. (५ दिवसाची सहल असल्याने ब्लॉग देखील तेवढा मोठा असणार त्यामुळे ब्लॉगचा दुसरा भाग लिहिण्यास थोडासा वेळ लागला. परंतु तरीही सहलीच्या प्रत्येक क्षणाची एक आठवण म्हणून मी हा ब्लॉग लिहिला आहे. तो कसा झाला आहे हे आपणच ठरवा.) 







  


Friday 8 September 2017

तुफानी रंगीबेरंगी कर्नाटकी सहल...

कर्नाटक-जोग फॉल ट्रिप

पुणे ते मुंबईमुंबई ते भटकळ शहर आणि
सहलीचा पहिला दिवस श्रीमुरुडेश्वर बीच आणि गोपुरम 
२ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर २०१७



सप्टेंबर महिना म्हणजे माझ्या खूप साऱ्या एव्हरग्रीन मित्रमैत्रिणींच्या वाढदिवसांचा महिना आहे. २० ऑगस्टच्या कातळधाराच्या धुव्वाधार ट्रेक नंतर तुफानी काहीतरी हवेच ना नाहीतर माझी ट्रेकमुळे रुळावर असलेली(२० टक्के तंदुरुस्त शरीर आणि मन) गाडी आणि बॉडी एकदमच बंद पडते.खरे तर सध्या माझे शरीर साथ देत नाहीये काहीतरी कुरबुरी सुरूच होत्या त्यामुळे हाताला सलाईन टोचून इंजेकशन टोचून बोर झाले होते पण मन मात्र सदैव आंनद उपभोगायला आणि हुंदडायला तयार असते अर्थात सगळ्या जबाबदारी पेलूनच. त्यात  २ सप्टेंबर ते ६ सप्टेंबरची "फोना"ग्रुपची 'कर्नाटक जोगफॉल ट्रेक कम सहल" कोण सोडणार. त्यात सगळ्या वयाचे मित्र मैत्रिणी असणार होते. मग मी तर हा प्रवास आणि आणि सगळ्यांच्यातली धमाल सोडणेवाली नाहीये.या सहलीचे बुकिंग ३-४ महिने अगोदर करावे लागते त्याप्रमाणे केले होते परंतु खरी तयारी सहलीच्या एक दिवस अगोदरच झाली आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि परवानगीने थोडा गरजेपुरता दवाखाना घेऊन शेवटच्या दिवशी शोभाबरोबर बोलले तेव्हा मी माझे जाणे पक्के केले. कारण मी सहलीला आहे म्हणून ही पोरगी येणार होती. तिला एकाच बॅगेत सगळं कसं बसवायचं याची माहिती दिली आणि चार-पाच दिवसांचा भन्नाट आंनद माझ्या पदरात पडणार या हव्यासाने मी माझी सॅक भरली.

२ सप्टेंबरला शनिवारी दुपारी चिंचवडहून ४:१५ ची कोयना-सी एस टी एक्सप्रेससाठी माझे मिस्टर दीपक आणि मुलगी प्रभा मला स्टेशनला सोडायला आले. तिथेच सहलीला जाणारे इतर मेंबर्स उपस्थित होते.२ च लोक ओळखीचे होते बाकी अनोळखी होते तरीही मी सवयीप्रमाणे थोडाही वेळ न घालवता बेझिजक लगेच आमची तिथेच टीम बनवली आणि फोटोला सुरुवात झाली. (मी,रेशमा रणसिंगमिस्टर रणसिंगसुमित म्हेत्रेमनोज राणे सरशोभाआणि डॉक्टर संदीप बाहेटी इतके लोक आम्ही चिंचवड स्टेशन ला गाडीमध्ये चढलो.)   गाडी सुटली कितीही नाही म्हंटले तरी मुलीला आणि मिस्टरांना निरोप देताना डोळे भरून आले पण ते मी दाखवले नाही इतकेच.😢😔🤗मुंबईचा प्रवास सुरु झाला. पुण्याहून काही लोक आधीच या ट्रेनमध्ये बसून आले होते त्यात सुनील विंचु आणि निमा विंचू हे दोघे होते आणि अजून काही मेंबर्स होते तसेच तळेगावला आणि लोणावळ्याला बरेच सहलीचे लोक बसणार होते. त्याप्रमाणे तळेगावचे लोक गाडीमध्ये चढल्यावर आणि तेव्हा झालेल्या गर्दी आणि गोंधळाने मग खरे मोठ्या सहलीला निघालो आहोत याचा प्रत्यय आला..😊
लगेच एक ग्रुप सेल्फी काढून गप्पा सुरु. लोणावळा गेल्यावर लगेच कर्जत आले. आणि दुपारी जेवण करून निघाल्यावर फारशी भूक नव्हती त्यामुळे कर्जतचा स्पेशल चविष्ट वडा आम्ही घेण्याचे टाळले परंतु वडेवाल्याचा वड्यासहित फोटो मात्र घेतला. त्याने पण मस्त पोज दिली. गाडीने घाट सोडला तसे गरम होऊ लागले. मी देखील मुंबईचीच आहे तरीही आता पुण्याच्या थंड हवेची  सवय झाल्याने मुंबईचा उकाडा सहन होत नाही.

गाडीतून मुबईच्या नाल्यांचे ओढ्यांचे दर्शन झाले तेव्हा मन खिन्न झाले जेव्हा केव्हा प्रलय होईल तेव्हा हाच आपणच माणसाने फेकलेला प्लास्टिक आणि इतर कचरा आपल्याच नाकातोंडात जाईल. कचर्याची योग्य विल्यवाट नाही लावली तर आपले आरोग्य धोक्यातच आहे."फोना" टीम ट्रेकिंग दरम्यान आणि कुठेही प्लास्टिक आणि  न विरघळणारा कचरा सोडून येत नाही उलट जमेल तेव्हा तोच कचरा गोळा करून आणतो. आमच्या ट्रेनच्या डब्यामध्ये सगळ्यांच्या ओळखी नाही झाल्या तरी १० बारा लोक यांची खाऊ वाटप, मजा मस्ती फोटोग्राफी सुरुच होती.  म्हणता म्हणता  रात्री ८.२० वाजता आम्ही शिवाजी टर्मिनन्सला पोहोचलो. आमची मुंबई-मंगळुरु एक्सप्रेस ९:३० वाजता होती परंतु ती ४-५ दिवस सतत ४-५तास उशिराने येत होती त्यादिवशी तरी ती म्हणे आली तर वेळेवर येईल नाहीतर २२ तास लेट होती ते ऐकून आमचे धाबे दणाणले. २२ तास इथेच राहिलो पुढच्या सहलीचा खेळ खंडोबाच होईल. आम्ही आपले वेटिंग रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन घरून आणलेले रात्रीचे जेवण करून घेतले.
मी तांदळाची पांढरी शुभ्र उकडीच्या पिठाची भाकरी,भेंडीची भाजी आणि खोबऱ्याची चटणी आणली होती. निमाने आणलेली चकली, बटाटा भाजी आणि कोबीची कोशिंबीर फारच आवडली. वेटिंग रूममध्ये छोटे छोटे ग्रुप करून बसलो होतो आम्ही. रेशमा रणसिंगे यांच्या ग्रुपची पूर्ण पोळी आणि इतर डिशेश एक एक घास टेस्ट केल्या मस्त होत्या. गाडी पकडायची लगबग असल्याने सगळ्यांनी आणलेल्या  पदार्थांची चव घेत आम्ही बसलॊ नाही. त्यातही आम्ही आईस्क्रीम घेऊन खाल्ले हे मात्र खरे.  आम्ही टेन्शन मध्ये असतानाच थोड्याच वेळात आमच्या एक्सप्रेसची घोषणा झाली आणि गाडी वेळेत येणार आहे इतके समजले आणि आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. 
९:३० वाजता ट्रेन आली आमच्या लीडर्सने आमची गाडीची  तिकिटे आमच्या हातात दिली अनोळखी लोक बोगीच्या एका कंपार्टमेंट मध्ये आलो होतो. प्रमिला गुंजाळ, मिस्टर गुंजाळ,शिल्पा बाब्रसमी आणि शोभा. क्या हुवा अनोळखी है तो ओळख करून घेणे में हम पटाईत है. आम्ही लगबगीने गाडीमध्ये आमचे सामान टाकले आणि १० वाजता गाडी निघाली. मुंबई सोडताना मला माझ्या मुंबईतील जुन्या सुखद आठवणी आल्याशिवाय राहिल्या नाही. बहुदा  मी मुंबईची असल्याने सगळ्यागोष्टींमध्ये फास्ट असते.😊👍 प्रलय आला तरी दुसऱ्या दिवशी पाणी ओसरताच पूर्वपदावर येणाऱ्या माझ्या मुंबईचा आम्ही निरोप घेतला आणि गाडीमध्ये बसलोआमचे लीडर्स म्हणाले की मुख्य गाडी वेळेत आलीच नाहीये सी एस टी-मंगळुरु एक्सप्रेस मुख्य गाडीऐवजी दुसरी जादाची गाडी रेल्वे खात्याने मागवली होती. हे आमचे  अहोभाग्यच होतं म्हणा.

मला गोव्याचा दूधसागर धबधबा एकदा तरी किमान पाहायचा तरी होता. खर तर दूधसागरच्या वाटेने आमची गाडी जाणार नव्हती तरीही मला आपला वेड्या मनाला वाटलं चुकून दूधसागर आला तर आला मला भेटायला.  (गमतीचा भाग आहे हा लगेचच विचार करत बसू नका.😂😂) गाडीमध्ये आम्ही सगळे सामान लावून झोपण्याच्या तयारीने आपल्या सीटवर जाऊन बसलो खरे. परंतु शोभा आणि मला सगळ्यांसोबत गप्पा मारायच्या होत्या आणि झोपदेखील आली होती. पूर्ण बोगी आमच्या "फोना"च्या ६० लोकांच्या मालकीची होती. ओळखी व्हायच्या असल्याने आम्ही जरा शांत होतो. घरात किमान वॉट्स अँप वर संपर्क राहावा म्हणून मेसेज करायला तर जिओ सिमचा काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यामुळे शोभाच्या फोनवरून घरी कॉल करून वोडाफोन वर नेट आणि बॅलन्स टाकून तात्पुरते नेट सुरु केले.थँक्स शोभा.😍 कारण का? तर माझ्या मुलीचे प्रभाचे बास्केटबॉल खेळामध्ये चांगला खेळ खेळली म्हणून पेपरला नाव आले होते. पाखरांना सोडून चिमणी घराबाहेर पडली तरी पाखरांची ओढ ही जास्त  आणि कायम असते. 😍  २ तास गेल्यावर झोपायचे ठरवले परंतु कणकवलीला उतरणारे जवळ जवळ १५ लोक(बिना रिझर्वेशन वाले) आमच्या बोगीमध्ये मस्त आमच्या सीटच्या जवळ बसले होतेकोणी झोपले होते. कोणी फोनवर खेळत होते.काळजी वाटली म्हणून लीडर्सने येऊन त्यांना दुसऱ्या डब्यात जाण्यासाठी विनंती केली. आधी ते जागचे हलायला तयार नव्हते कारण त्यांचा हा प्रत्येक आठवड्याचा प्रवास असेल.  नंतर ते गेलेही परंतु रात्री ३ नंतर मला जाग आली तेव्हा ते आमच्या सीट जवळ येऊन खाली जमिनीवर झोपलेले मी पाहिले. मराठी कोकणी माणसं होती त्यांचा तसा त्रास काहीच नव्हता. मी आपली दूधसागरच्या आशेने ५ वाजता उठले परंतु सगळे झोपले असल्याने मला ६ वाजेवाजेस्तोवर वाट पाहावी लागली. ६ वाजता उठून मी शोभाने चहा घेतला आणि शोभा परत झोपली मी मात्र सकाळची शुद्ध हवा खाण्यासाठी आणि कोकणातील निसर्गसौंदर्य  अनुभवण्यासाठी आणि कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी खाली उतरून सगळं आवरून खिडकीजवळ येऊन बसले. कणकवली गेल्याने ते १५ लोक उतरले होते आमची बोगी आता फक्त आमच्या ६० लोकांची होती. आजच्या पिढीतील सर्वांचे आवडते गीतकार, कवी, व्यंगचित्रकार  गुरु ठाकूर यांचे गाव गोवा आणि तिथली कौलारू घरे आणि हिरवागार शालू पांघरलेला निसर्ग  एखाद्या चित्राप्रमाणे रेखीव भासत होते. गोवा जणू आम्हाला खुणावित होते की येवा कोकण आपलाच असा राजापूर, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, गोवा असा तोच सुंदर निसर्ग डोळ्यात आणि कॅमेऱ्यात कैद करून घेत आम्ही वेगाने पुढे जात होतो.




सगळे हळूहळू जागे झाले.मग ओळखी सुरु झाल्या. आमच्या जवळ बसलेले प्रमिला वाळुंज आणि मिस्टर वाळुंज (पुणे लायन्स क्लब चे अध्यक्ष होते.) अतिशय मनमिळावू स्वभावाचे होते. प्रमिलाने आणलेले घरी बनवलेले बुंदीचे लाडू एकदम आवडले मला आणि सर्वांनाच.👌👌 मला पोटामध्ये जरा इंन्फेकशन  असल्याने मी ट्रेनमधले काही खाणे टाळलेच. फक्त चहा तेवढा  घेतला. सगळ्यांनीच सोबत आणलेला खाऊचा नास्ता करून घेतला. आणि मग सगळ्या बोगीमधून हास्यकल्लोळचा आवाज येऊ लागला आता खरा सहलीचा रंग चढू लागला होता. मी शोभाने बोगीमध्ये चक्कर टाकली बोर झालेल्या पल्लवी, सुप्रिया, शिल्पा यांना घेऊन अंताक्षरी सुरु केली. मग जरा चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. तितक्यात मंदार सर म्हणाले अरे आपलं स्टेशन येईल आता आवरून मग अंताक्षरी खेळू. मग बॅगांची आवराआवरी करून पुन्हा अंताक्षरी  खेळू लागलो. मध्येच मोठमोठे बोगदे यायचे तेव्हा आम्ही उत्साहाने सगळेच मोठमोठ्याने शिट्या मारीत होतो,ओरडत होतो,प्रवासाची मरगळ घालवण्यासाठी हा छोटा उपाय छान 👌होता..😊एकाच बोगीतून एकमेकाला साद घालीत होतो. एकीकडून मंदार सर,मिस्टर वाळूंज आणि आम्ही सगळे तर दुसरीकडे राणे सर,रोहीत सर असे सगळे होते. पूर्ण एक्सप्रेसमध्ये आमचाच गोंधळ चालू होता..फोना Team Rocks✌...
१२ च्या सुमारास कारवार,गोकर्ण रॊड, कुमटा नंतर दुपारी दीड वाजता दक्षिण भारताच्या कर्नाटक राज्यात उत्तर कन्नड  जिल्ह्यात भटकळ स्टेशनवर आम्ही पोहोचलो.
आम्ही अन्ताक्षरीचा वेग कमी केला आमच्या वजन बॅगा घेऊन भटकळ स्टेशनला उतरलो. आमच्या ट्रिपचे नियोजन करणारे श्री नितीन पवार यांनी अगोदरच आम्हा ६० लोकांसाठी ३ बसेसची सोय केली होती. भटकळ स्टेशन स्वच्छ होते.
थोड्या वेळातच आम्ही ज्या ठिकाणी ४ दिवसांचे रहिवाशी होतो तिथे आर एन एस हायवे हॉटेल मध्ये पोहोचलो. आम्हाला सगळ्यांना फ्रेश होण्यासाठी एक एक रूम दिली फ्रेश होऊन आधीपासूनच तयार असलेले जेवण केले.  तिथे जाईस्तोवर आम्ही एकएकटे आलेल्यांना काहीच  माहिती नव्हते आमचे रूम पार्टनर कोण आहेत ते. तिथे गेल्यावर आमच्या हाती रूम नंबर आणि रूम पार्टनरची नावे दिली. शोभा आणि नोवा शिंदे मी असे भारी,हसवणारे 😊😂रूममेट्स एकमेकांना मिळालो होतो.
आपल्या रूममध्ये जाऊन जरा रिलॅक्स होऊन आवरून ४च्या सुमारास पहिल्या दिवसाच्या प्रवासाला निघालो. पहिल्या दिवशी तेथील ३ कि मी वर असलेला मुरुडेश्वर बीच आणि गोपुरम इथे पोहोचलो. अरबीसमुद्राच्या जवळ हे ठीकाण आहे. मुरुडेश्वरचा किनारा हा कर्नाटकातील सर्वात सुंदर समुद्र किनारा आहे. पर्यटकांसाठी दोन्ही बाजूने लाभदायक आहे. धार्मिक स्थळांचे दर्शन होते आणि निसर्गाचा आनंददेखील लुटता येतो. इथे गोपुरम् ही २१ मजली इमारत 232 फूट उंंच आहे  इथे लिफ्टची सोय आहे. तसेच गोपुरम च्या दारात भव्य हत्तीची प्रतिकृती आहे. तसेच गणपती मंदिर आहे.  श्री. मुरुडेश्वरची मूर्ती 123फूट उंच अशी भव्य आहे. तेथील एन. आर. शेट्टी नावाच्या व्यावसायिकाने  ४ करोड रुपये खर्च करून ही मूर्ती बनवली आहे.ही  भव्य सुंदरसुबक मूर्ती अशी बनवली आहे की सूर्याची किरणे या मूर्तीवर पडली तर ही मूर्ती चमकते हे वैशिष्ट्य आहे. आम्ही आधी समुद्रामध्ये बांधलेल्या नवीन बीच रेस्टॉरंटमध्ये गेलो तिथून ती  गोपुरमची इमारत  आणि श्री मुरुडेश्वर ची मूर्ती मनमोहक दिसत होती त्यामुळे आम्ही लगेच तिकडे निघालो.
विंचू सरांनी आमची गोपुरम् ची तिकिटे काढली. कर्नाटकमध्ये मंदिराच्या आवारात सॉक्स आणि चपला काढल्या. आपण आपल्या महाराष्ट्रात मंदिरात जाताना चपला तर काढतोच पण सॉक्स कधीतरी घालून जात असतो पण तिकडे  सॉक्स काढायचे म्हणजे काढायचे असा कडक नियम आहे.  आधी गोपुरम मध्ये गेलो. २१ माजली इमारत आहे परंतु १८ व्य मजल्यापर्यंत जाण्यास परवानगी आहे. १० -१० च्या ग्रुप ने लिफ्ट ने वरती गेल्यानंतर तिथून श्री मुरुडेश्वरची मूर्ती अतिशय भव्य आणि सुबक दिसत होती. तिथे त्या खिडकी मध्ये फोटो काढण्यासाठी आमच्याच लोकांची दाटी झाली होती. तिथून मुरुडेश्वर डोळ्यात आणि मानत साठवून आम्ही लिफ्टने उतरून  मंदिरात गेलो तिथे गाभाऱ्यात कोणत्याच देवाचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. कर्नाटक मध्ये त्यांचे  कर्नाटकी भाषेवर इतके प्रेम आहे की आम्हाला कुठेही मराठी किंवा हिंदी सूचना फलक पहावयास  मिळाला नाही. कन्नड आणि फार तर इंग्रजी मध्ये सूचना फलक लावले होते. आम्ही गणपती मंदिरातून मुरुडेश्वरची मूर्ती पाहावयास निघालो. सूर्य अस्ताला निघाल्याने आमची एकच धांदल उडाली होती कारण आम्हाला त्या बीचवर जायचे होते. परंतु इकडे मुरुडेश्वरच्या मूर्तीजवळ मानवनिर्मित गुहा देखील पाहायची होती. आम्ही आपले फोटोग्राफी करत ती गुहा फिरून १५ मिनिटामध्ये बाहेर आलो तोवर सूर्य अस्ताला गेलाच. पण त्या संधीप्रकाशात खरोखर ती मूर्ती चमकत होती. डोळे तृप्त होत होते. पण मन मात्र भरत नव्हते. प्रत्येक ऐतिहासिक प्राचीन मंदिराला काही ना काही इतिहास असतो त्या मागे काहीतरी कथा दंतकथा असते. मुरूडेश्वरच्या मोठ्या शंकराच्या पुढे रावण एका गुराख्याच्या छोट्या पोराला शंकराची पिंड धरायला सांगताना बघुनच ह्या मुरुडेश्वर विषयीगोकर्ण विषयी कुतुहल होते. ही मोठ्ठ्या शंकराची मूर्ती कंडुकागिरी नावाच्या डोंगरावर आहे तिथेच त्या मूर्तीखाली जिथे पिवळे खांब दिसत आहेत तिथे असलेल्या कृत्रीम मानवनिर्मीत गुहेत ही कथा चित्ररुपात साकारलीये.

५ मिनिटे तिथे बसून लगेचच बसजवळ निघालो कारण लीडर्स ने ७ च्या आत घरात ची वेळ दिली होती. त्या नियमानुसार आम्ही लगबगीने निघून त्या बीच वरच्या रेस्टॉरंट मध्ये मस्त कॉफी  चा आस्वाद घेतला. तिथे आम्हाला एक पर्वणी मिळाली. लीडर्स म्हणाले ज्यांना नॉनव्हेज खायचे त्यांनी ४ दिवसांचे निवासी असलेल्या घरी जावा आणि ज्यांना व्हेज खायचे त्यांनी बाहेरच्या हॉटेलवर चला.आमची नॉनव्हेज खाणाऱ्यांची एक बस हॉटेल जवळ आली आणि २ बस तिकडेच बाहेर व्हेज जेवण करून आल्या. आम्ही २० लोक नॉनव्हेज जेवलो म्हणजे भरमसाठ काही खाल्ले असं काही नाही थोडासा बदल म्हणून कर्नाटकच्या नॉनव्हेज जेवणाची चव घेतली इतकेच. जेवण झाल्यावर पुन्हा यावरून सगळ्यांची ओळख करून घेण्यासाठी म्हणून राहत्या हॉटेलच्या बाहेर आलो परंतु बरेचसे लोक थकले असल्याने आणि सकाळी लवकर उठायचे असल्याने गुड नाईट म्हणून विश्राम करण्यास गेले. आम्ही 8ते 10 लोकांनी बाहेर आईस क्रिम मागवले अर्थात माझा वाढदिवस बळंच साजरा करून ट्रीट घेतली. त्यातदेखील वेगळी गम्मत. त्यावेळी काही लोकांची तरी ओळख झाली. त्यानंतर मात्र आम्ही तिघी १२ वाजता आमच्या रूम मध्ये गेलो. इतके थकलो असून आम्ही गप्पा मारत आणि दुसऱ्या दिवशी लवकर उठण्याचा नंबर दुसऱ्याच्या नाव ढकलत २ वाजता झोपी गेलो.आमची तिघींची याआधी इतकी ओळख नव्हती तरीही इतरांना वाटले की  शोभा माझी मुलगी तरी असावी (शोभा कोणत्या अंगाने माझी मुलगी दिसली ते आम्हा दोघींना समजले नाही हहाहाहाहा) आम्ही तिघी बहिणी तरी असू.आमचे  तिघाड पहिल्याच दिवशी छान जमले. अश्या प्रकारे पुणे ते मुंबई आणि मुंबई ते भटकळ प्रवास आणि सहलीचा पहिला दिवस एकदम आनंदात आणि धमाल मध्ये गेला.उत्तम नियोजनासाठी नितीन पवार सरमंदार सरराणे सररोहित सरनिकाळजे सर यांना माझ्यावतीने सगळ्यांकडून धन्यवाद. जितकी धमाल तितका ब्लॉग मोठा असल्याने २ऱ्या आणि ३ऱ्या दिवसाचा ब्लॉग वेगळा लिहिला जाईल आणि जमेल तसे सगळ्यांचा उल्लेख आणि फोटोज येतील याची कृपया वाट पाहावी.