Friday 21 June 2024

स्वप्नांशी खेळणारा माणूस



माणूस वयाने म्हातारा होतो त्याची कला आणि ट्यालेंट कायम तरुणच रहातात...
माणूस जन्माला आल्यापासून वयाच्या प्रत्येक वळणावर पावलोपावली काही ना काही चांगले वाईट शिकत असतो. कधी तो गरज म्हणून शिकतो क एकधी तो पर्याय म्हणून शिकतो कधी तो मनातील वेदना यातना कमी करण्यासाठी विसरण्यासाठी शिकतो.कधी कला विकसित करण्यासाठी शिकतो, कधी प्रसिद्धीसाठी शिकतो,कधी तो पैसा कमवण्याचं साधन म्हणून काहीतरी शिकतो.
वाईटाला धडा शिकविण्यासाठी वाईट गोष्टी शिकतो. किंवा जगाचा एखाद्या व्यक्ती चा बदला घेण्यासाठी वाईट गोष्टी देखील शिकतो.त्यातून काही निष्पन्न होत नाही ते वेगळे.😅😅
शिकलो तर चांगल्या गोष्टी शिकूयात...
आजच्या कलियुगात सोशल मिडिया म्हणजे आपला आरसा आहे. जसं इथे वाईट अनुभव येतात तसेच चांगले अनुभवदेखील येतात.प्रत्येक व्यक्ती आपल्याला आयुष्यात एक चांगला वाईट धडा शिकवून जाते. चांगले लोक चांगले विचार देतात वाईट लोक देखील आपल्यातील चांगले गुण विकसित करतात. 
अनुभवावरून सांगते की मला ना जेवण बनवायला येतं होतं ना अजून काही येत होतं.
लग्न झालं,मुलं झाली संसार कधी घडला बिघडला कधी आयुष्य बिघडलं पुन्हा घडलं.या सगळ्यात मी त्या त्या वेळेला बर्याच कला शिकून घेतल्या.बरीच लोक मला फालतू सल्ला द्यायची आता तूला काय करायचं आहे हे शिकून?आता ट्रेक करून काय करणार?आता चांगलं दिसून काय करणार??का???आपण मरेपर्यंत इतरांसाठी जगतो घरच्यांसाठी नातेवाईक आईवडील सगळ्यासाठी सगळं करतो मग स्वतःसाठी जगलो तर त्यात चूक काय आहे??? प्रत्येकाच्या घरातील वातावरण वेगळं असतं. कधी बंधनं असतात कधी जबाबदारी असते, कधी सुख असते कधी नसते पण तरी आपण जगतोच मग स्वतःसाठी जगलो तर काय बिघडले???वयाची पन्नाशी आली तरी मी रोज नवनवीन गोष्टी शिकते, अजून शिकतेयच, फुडी ग्रुपमुळे फुड पोस्ट विडीओज चांगल्या पद्धतीने सादर करायला शिकले.
ट्रेकींगमध्ये फोटोग्राफी विकसित केली. ब्लॉग लिहायला शिकले. हातात लिहायची कला होती ती ब्लॉग मुळे थोडी विकसित झाली. घरात स्वयंपाकघरात हजारो अन्नपदार्थ बनवायला शिकून आवडीने खायला घालायला शिकले त्यांच फार कौतुक झालं नाही कधी कारण ग्रुहीणीला कायम ग्रुहीत धरलं जातं परंतु त्यामुळे माझ्या मुलांना बाहेरचं जेवण फारसं आवडत नाही. आम्ही कंटाळा आला की बाहेर जेवायला जातो परंतु मुलांना फक्त माझ्या हातचेच पदार्थ जास्त आवडतात. हीच मी माझ्या अन्नपदार्थ बनवण्यासाठी घेतलेल्या कष्टाची, तुफान वेळ घालवून चांगले पदार्थ बनवून कुणाला आवडल्याची कष्टाची पावती समजते. 
कधी आपण एकटे पडतो तेव्हा आपण मित्र मैत्रिणींना सहज शेअर करतो काहीवेळा त्याचा गैरफायदा घेतला जातो आयुष्याची वाताहत होते.पुन्हा त्या सगळ्यातून बाहेर यायला आपण ज्योतिषी बितीशी कडे पुन्हा काही तरी आयुष्याची वाट लागते पुन्हा एकदा आयुष्य पणाला लागते. त्यापेक्षा जेव्हा जेव्हा मनाला स्ट्रेस पासून वाचण्यासाठी मी एखादी कला शिकते. मग ते चित्र काढणे असो. किंवा विडीओ एडीटींग असो.पेटी वाजविणे असो की गायन शिकणं असो की गाणं गाणं असो. आयुष्याचं गाणं गाऊन वाजवायला मात्र मला कधी जमलंच नाही 😂😂😅😅त्याचे स्वर कायम बिघडलेलेच रहातात..😂😅😅मी सतत मला कशात तरी मग्न ठेवून त्यातून चांगले काहीतरी करत रहाते. त्यावर माझं You Tube channel चालायला मदत होते. मध्येच त्या चॅनेल ला पण वात येतो माझ्यासारखाच पण पुन्हा चालतं 😂😅😅
आपलं दुःख कहाणी सहज शेअर करतो ते इतरांना मानसिक आजार ठरवून मानसोपचार तज्ज्ञाकडे जायचा सल्ला देतात काही मंदबुद्धी लोक. आपल्या आयुष्यातले संघर्ष आपणच सहन करून सोडवू शकतो. आपल्याला स्वातंत्र्य नसेल तर आपला स्ट्रेस वाढतो आणि आपलं शरीर संतुलन बिघडते. आणि मग दवाखान्याच्या फेरीत वाढ होते ते नको असेल तर आपल्या आवडीनुसार आपल्याला सगळं करायला मिळाले की आपण निश्चिंत राहून शारीरिक व मानसिक संतुलन उत्तम रहाते. एखाद्याशी मनमोकळेपणाने बोललो की आपलं मन शांत रहातं पण ती एखादीच व्यक्ती असते आपण कुणाशीही बोलू शकत नाही कारण सगळे विश्वासू नसतात..
सोशल मिडिया जसा वाईट तसा चांगला देखील आहे. असंच होतं लिहीता लिहीता भरकटतो आपण😅😂
मनातलं चित्र कागदावर असं उतरतं कधी कधी 😅😂
आयुष्य असंही घडतं कधी बिघडतं हे असं चालूच रहाणार...
पण मी मरेपर्यंत काही ना काही शिकत रहाणार आणि उड्या मारत रहाणार कोणाला काही अडचण असेल तर सांगा बरे....😅
.
.
.
Patil Jayuu 
30 March Year Ending चा ज्ञानी स्टेटस....😅😅
बुरा ना मानो भाई होली हैं 😂