“महासागरात भिंगरी"
२१ मार्च हा दिवस केव्हाही विसरणार नाही.कारण
मी आत्ताच लिहिलेल्या "ध्यास के२एस चा" या माझ्या ब्लॉग चे आर्टिकल
दैनिक महासागर या बातमीपत्रात छापून आले होते. पालघरचे श्री. संतोष पाटील यांनी मला ही
बातमी whats app च्या ग्रुप ला
दिली.खरं तर आधी माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. संतोष पाटील यांनी मला बातमी
आलेल्या बातमीपत्राच्या कात्रणाचा फोटो पाठवला होता परंतु मला काहीही सुचत
नव्हते. सगळ्यात आधी मी माझ्या घरच्यांना
ही बातमी सांगितली आणि त्यानंतर माझ्या मित्रपरिवाराला whats app वरून पाठविण्यास सुरुवात केली. २-३ ग्रुप वर टाकली.
हा शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. कारण मी
ब्लॉग लिहिण्यास सुरु करून एक वर्ष झाले. परंतु गेल्या २-३ महिन्यांपासून ब्लॉग
लवकर लिहा madam असा वाचकांचा आग्रह येवू लागला. आणि मलाही
ब्लॉग लिहिणे आता बऱ्यापैकी जमू लागलेय असे वाटू लागले आहे. मला स्वतःला ब्लॉग
लिहिण्याचे समाधान मिळत आहे.
असेही “मला
मी आवडते” तसेच इतरांनाही आवडते. काहींना माझे लिखाण
आवडते, काहींना माझा सर्किट स्वभाव आवडतो. काहींना
आवडत नाही. असो. आत्ताचा विषय आहे तो माझ्या आर्टिकल चा. तर मला स्वतःला माझे
फोटोज आणि लिखाण माझ्या मित्रपरिवाराला शेयर करायला आवडते आणि कौतुक करवून घ्यायला
ही आवडते. कारण सध्या ट्रेक आणि लिखाण ह्या दोनच माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत की
मी त्या मनापासून करते.
मी त्या कात्रणाचा एक चांगला फोटो
नेटवर शोधू लागले. मी घरातल्यांना कामाला
लावले. जरा चिडचिड देखील केली मी. पण आजचा आनंद आजच साजरा करायला मला आवडते. तो
आनंद शिळा झाल्यावर काही मजा नाही बुवा. आपला स्वभाव असाच
आहे. संतोष पाटील यांनी स्वत:हून माझे आर्टिकल छापून आणले होते. आधी त्यांना
मनापासून धन्यवाद दिले आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली एकीकडे फेसबुकवर तो
कात्रणाचा फोटो अपलोड केला आणि शुभेच्छा घेवू लागले. एकीकडे शुभेच्छांचे
मेसेजेस येतच होते. तनयाने माझी परवानगी घेवून ती बातमी “फोना’ ग्रूप
ला टाकली. सग्गळ्या ग्रुप मधून शुभेच्छांचा वर्षाव होत होता.
मी त्या दिवशी जेवणच विसरले होते,तहानभूक
हरपली माझी. सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या परंतु एक व्यक्ती राहिली होती आणि
मला मात्र तिचा प्रचंड राग आला होता. ती व्यक्ती बिझी असेल पण माझा मेसेज वाचला
नाही अजुन याचे वाईट वाटले होते. फोनवर बोलून आणि मेसेजेस ला रिप्लाय करून माझा हात दुखला होता पण तरीही आनंद किती होता हे मात्र विचारूच नका. माझे एफ बी खाते शुभेच्छांनी ओसंडून वाहत होते. घरातले सगळे झोपले तेव्हा मी माझे जेवण केले.
त्यानंतर रात्रीचा १ वाजला तरीही मी जागीच होते.
काहीजण विचार करत असतील एव्हढा काय आरडओरडा करतेय ही? एव्हढे
मोट्ठे काय काय झालेय असे आंनदाने नाचायला?
संतोष पाटील यांना माझा ब्लॉग छापवासा वाटला
आणि त्यांनी तो छापला देखील. हेच माझ्यासाठी खूप आहे. संतोष पाटील यांचे खूप
आभार त्यांनी जवळपास अर्धे पान माझ्या
ब्लॉग विषयीच्या लेखाला दिले होते. केव्हढी मोठ्ठी शाबासकीची थाप आहे ही
माझ्यासाठी ते मलाच ठावूक. माझ्या ब्लॉगला
त्यांच्या दैनिक महासागर या बातमी पत्रात केव्हढे मोट्ठेस्थान दिले आहे
याची जाणीव मला आहे. आणि ती बातमी वाचून बरीच मंडळी जे ट्रेक ला जात नाहीत ते ट्रेक ला सुरुवात तरी करतील आणि पालघर या
ठिकाणी माझे खूप नातेवाईक आहेत त्यांना भिंगरी चा ब्लॉग देखील आवडेल.
माझा स्कूलमेट प्रदीप जाधव याने माझ्या या
आर्टिकल वर एक टिपण्णी केली ती मला मनोमन आवडली. “महासागरात भिंगरी.”
वाह क्या बात है प्रदीप जियो प्रदीप.
रात्रीचा एक वाजला मी आपली आंनदाने भुतासारखी
जागीच कारण एका व्यक्तीचा रिप्लाय अजून आलाच नव्हता आणि त्या व्यक्तीशिवाय माझा
आनंद पूर्ण कसा होणार काय सुजी, सूची,अंजी,अंजली, हेमा, उज्जू, गीतांजली, सुषमा, खरय ना?
कधी एकदाचा दिवस उजाडतो अस मला झाले होते.उजाडला एकदाचा २२ मार्च आणि मी जाग आल्या आल्या आधी माझे एफ फी खाते तपासले त्या व्यक्तीची कॉमेंट पाहिल्यावरच डोके शांत झाले. नाहीतर मग मी थयथयाटच केला असता. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून शालिनी होती.
कधी एकदाचा दिवस उजाडतो अस मला झाले होते.उजाडला एकदाचा २२ मार्च आणि मी जाग आल्या आल्या आधी माझे एफ फी खाते तपासले त्या व्यक्तीची कॉमेंट पाहिल्यावरच डोके शांत झाले. नाहीतर मग मी थयथयाटच केला असता. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून शालिनी होती.
तिला माझ्यापेक्षा जास्त आनंद झाला. माझा ब्लॉग
छापून येणे हे तिचे स्वप्न होते. नेमके दुसर्या दिवशी जागतिक कविता दिवस होता आणि
माझा ब्लॉग ही बातमीपत्रात छापून आल्याने
तिने माझ्यावर एक सुंदर कविता केली. माझे गिफ्ट मला मिळाले. याहून वेगळा आनंद तो
काय असतो. माझ्या सगळ्या मैत्रिणी अश्याच आहेत.
एकेकीवर स्पष्टीकरण देत बसले तर आख्खी बातमीपत्र कमी पडतील. शालिनीने
माझ्यावर केलेली कविता खाली देत आहे.
ही कविता मला आणि सगळ्यांनाच खूप आवडली. तुम्हालाही
आवडेल. माझ्या एका फोटोवर तिने ती फेसबुकवर पोस्ट देखील केली. वाचकहो ज्यांना ती
कविता वाचायला मिळाली नसेल त्याच्यासाठी खास इथे मी पोस्ट करत आहे.
पहाटेच्या सोनेरी किरणांनी जागी
होणारी मुग्ध कळी तू…….
हवेच्या गार झुळुकीने हळूच
स्वतःला उलगडणारी कोमल पाकळी तू …
दरीखोरीतून घुमणारी डोंगर कपारी
बागडणारी एक स्वच्छंद शीळ तू
खळखळून हसणारा झरा कधी तर कधी
उदास दिसणारी संध्या सावली तू
भरभरून प्रेम देणारी पाउसधारा तू
तर कधी लहरी मेघासारखी रंग बंदलणारी तू
कधी हसणारी तर कधी रडणारी, क्षणात बदलती भाव तू
कधी ग्रीष्म, कधी शिशिर तर कधी फुलून जाणारा
वसंत तू…
घरातल्या मेंबर बरोबरच आईवडील, भाऊ-वहिनी माझे स्कुलमेटस ममता, निता, वनिता,अनुराधा, तुषार,
प्रदीप, सुनील, मनोज,दत्तू, धनी, दत्ता,भूपेंद्र, विलास जीजू, तसेच
शेजार- पाजार, फोनाचे मेम्बर्स महेश आणि रुपा पाठक,मंदार सर, राणे सर, रोहित, प्रथमेश,तनया, सुपर्णा, शैलजा,
सुरेखा, आभा, रश्मी,
शुभांगी, रोहिणी,राहुल,
प्रशांत, रेखा, प्रदीप,
किरण,मुनोत, पियुष,
सोरभ, सारंग, संतोष
होली, माझे फेसबुक फ्रेंड्स, सुजी,
सूची, अंजी, हेमलता,
गीतांजली, उज्जू,मिताली,
रश्मी, आणि अंजली शालिनी, सुषमा,राहिलेले सर्व मित्र परिवारचे शतश: आभार.
माझा आनंद द्विगुणीत केलात, माझ्या आनंदात सहभागी झालात.
इथून पुढेही असे लेख छापून येतील न येतील परंतु पहिला लेख छापून आला आणि माझी बातमीपत्रात चांगली बातमी आली हेच माझ्यासाठी
नवीन आणि कौतुकास्पद आहे. पहिल्या पहिल्या आनंदाची मजा काही औरच……
माझे आर्टिकल छापून आल्याचा आनंद आणि
मैत्रिणीने केलेल्या कवितेचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी ब्लॉग शिवाय पर्याय
नव्हता. मलाही हा आनंद कायम स्मरणात राहील. धन्यवाद संतोष पाटील आणि धन्यवाद
शालिनी आणि सर्व मित्र-मैत्रिणींनो ………


